शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

‘लाचलुचपत’च्या इतिहासातील सर्वांत मोठा अपसंपदा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर आज पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. हा लाचलचुपत ...

पुणे : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर आज पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. हा लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासातील अपसंपदाबाबतचा सर्वांत मोठ्या रकमेचा मोठा खटला असून, कोरोनाकाळात लॉकडाऊन असतानाही अतिशय वेगवान तपास होऊन साधारण ८ महिन्यांत पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीश सोनावणे, सहायक फौजदार उदय ढवणे, हवालदार अशपाक इनामदार, अंकुश माने यांच्या पथकाने दिवसरात्र तपास करून दोषारोपपत्र तयार केले आहे.

फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक

हनुमत नाझीरकर याने वेगवेगळ्या ३८ कंपन्या स्थापन केल्यापासून त्यात त्याने लाचखोरीतून मिळविलेले कोट्यवधी रुपये गुंतवले. या कंपन्यांमध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीने पैसा फिरविला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात आली आहे.

१०० वर साक्षीदारांचे जाब-जबाब

हनुमंत नाझीरकर याची मालमत्ता उघडकीस आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगवेगळी पथके तयार केली होती. त्यांच्या ३८ कंपन्यांमधील कर्मचारी, नातेवाईक, बनावट अग्री पावत्या करणारे विक्रेते, चार्टर्ड अकाऊंटंट अशा सुमारे १००हून अधिक लोकांचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत.

अनेक अडचणींवर मात करून वेगवान तपास

या दोषारोपपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे सरकारी कार्यालयांकडून प्राप्त करून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोठी मेहनत करावी लागली. कोरोनामुळे अनेक सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्र्यांची संख्या कमी होती. त्यात ही सर्व कागदपत्रे २००५ पासूनची होती. इतके जुने रेकॉर्ड शोधावे लागले. बँकांमधून १० वर्षांनंतर रेकॉर्ड नष्ट केले जाते. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सर्व जुने रेकॉर्ड मिळावावे लागले. इतक्या सर्व अडचणी असतानाही केवळ ८ ते ९ महिन्यांत या पथकाला दोषारोप पत्र दाखल करण्यात यश आले आहे.

.......

जामीन फेटाळताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण नोंद

हनुमंत नाझीरकर व राहुल खोमणे यांचा जामीन अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला होता. त्यात न्यायालयाने म्हटले की, ज्या गुन्ह्यामध्ये सार्वजनिक मालमत्ता गुंतलेली असते. अशा गुन्ह्यात जामीन दिला जाऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. ते मत न्यायालयाने नोंदवून या गुन्ह्यात सरकारी पदाचा उपयोग करून लोकांकडून पैसो कमविला आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यात खटला सुरू होईपर्यंत जामीन देण्यात येऊ नये.