शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अण्वस्त्र क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचाय : डॉ. टेसी थॉमस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:06 IST

प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते..

ठळक मुद्देकीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कार 

पुणे : ‘प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते. भारताने अण्वस्त्र क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे, असे सांगून बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांनी अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पातील अनुभव विशद केले. कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांना तर ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ पुणे येथील आर्टिस्ट्रीच्या वीणा गोखले आणि पुणे येथील जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांना विभागून देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक,आयोजक सुरेश रानडे, तसेच यंदाच्या आदर्श सहचारिणी पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पत्नी वैशाली माशेलकर, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या पत्नी संजीवनी मुजुमदार आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थॉमस म्हणाल्या, ‘सतत शिकत राहायचे ही आईची शिकवण आणि एका यशानंतर आता पुढे काय, याचा सतत ध्यास घ्यायचा असे प्रोत्साहन देणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम या दोन व्यक्तींनी माझे आयुष्य ख-या अर्थाने घडवले. पालकांच्या दृष्टिकोनाचा तुमच्या जडणघडणीवर खूप परिणाम होत असतो. कुटुंब गरीब आहे की श्रीमंत, याहीपेक्षा ते शिक्षित आणि ध्येयवादी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असते.’ श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींना मदतीची गरज असते. अनेक व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासाठी काम करतात. आपण प्रत्यक्षपणे काम करू शकत नसलो, तरी अशा व्यक्ती आणि संस्थांना जमेल ती मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपले दान सत्पात्री जावे, अशी प्रत्येकाची भावना असते.’ यावेळी मुक्ता टिळक  म्हणाल्या, ‘महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. बालके, किशोरवयीन मुले-मुली, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक घटकांच्या विविध समस्या सोडविणे गरजेचे आहे.’सुरेश रानडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. रवि नातू यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे