शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:04 IST

दरवर्षी पावसाळ्यात या गडांवर पर्यटक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात, कोरोना आणि गडांवरील अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय

ठळक मुद्देसेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटनांकडे पर्यटक दुर्लक्ष करू लागले

भोर: सध्या पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे दुर्गभ्रमंतीसाठी अनेक पर्यटक किल्यांवर येतात. मात्र, दाट धुके, वादळी पाऊस, वारा यामुळे दुर्घटना होत असतात. तसेच कोरोना मुळे गडकिल्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भोर तालुका प्रशासनाने रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यावर पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले.

मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्यावर बंदी घातली होती. तर वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळ गडावर फिरायला गेलेला दहा वर्षाचा मुलगा पाय घसरुन पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडतात. या घटना होऊ नये या साठी प्रशासनाने दुर्गभ्रंमतीवर बंदी घातली आहे. वेल्हेतालुक्यातील किल्यावरील पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्यावर एकच गर्दी करु लागले होते. त्यामुळे सोमवारपासून भोर तालुक्यातीला किल्यावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

भोर तालुक्यात दर वर्षी पावसाळयात धबधब्यावर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट भाटघर आणी निरादेवघर धरणावरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असतात. यामुळे या गोष्टींचा विचार करुन भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्यावर आणी पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आली आहे.

वरंघ घाट व आंबाडखिडघाट परिसरात पडतात दरडी

भोर तालुक्यात पावसाळयात हिरवेगार डोंगर वृक्ष वेली डोगरातुन फेसाळत पडणारे धबधबे आहेत. हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळयात भोर महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbhor-acभोरGovernmentसरकार