शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

भुलेश्वर घाटाने घेतला मोकळा श्वास, नवीन वर्षात होणार दुरुस्ती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:55 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाºया भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाणा-या चा-या ठिकठिकाणी बुजल्याने तसेच घाटाला संरक्षण कठडे नसल्याने भुलेश्वर घाटाची आजही दुरवस्था झाली आहे. मात्र आता चारीतील झाडे काढण्यास सुरुवात झाल्याने श्री क्षेत्र भुलेश्वर घाट नवीन वर्षात मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाºया भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाणा-या चा-या ठिकठिकाणी बुजल्याने तसेच घाटाला संरक्षण कठडे नसल्याने भुलेश्वर घाटाची आजही दुरवस्था झाली आहे. मात्र आता चारीतील झाडे काढण्यास सुरुवात झाल्याने श्री क्षेत्र भुलेश्वर घाट नवीन वर्षात मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडे सासवड -यवत रस्त्याबरोबरच भुलेश्वर घाटाचीही दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून पाच कोटी चाळीस लाखांचा निधीही मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. यात भुलेश्वर घाटाचेही रुंदीकरण करण्यात आले. मात्र हा घाट सुरुवातीपासूनच पुरंदर व दौंड तालुक्यांच्या विभागाच्या कात्रीत सापडला. कामाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही तालुक्यांच्या हद्दीमध्ये हे काम वनविभागाने बंद केले. यामुळे या घाटाचे सुरुवातीपासूनच अनेक अडथळे आले. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आला. यामुळे उन्हाने डोंगर तापून पावसाळ्यात तो भिजला जाऊन सध्या ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. पाणी वाहून जाणाºया चारीमध्ये डोंगराची दगडमाती पडल्याने चारी ठिकठिकाणी बुजल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. यामुळे अनेक ठिकाणी घाटरस्ता खराब झाला आहे. घाटाचे रुंदीकरण झाले मात्र पुलांची कामे करण्यात आली नाहीत. नवीन पुलांचे पाईपही घाटात टाकले गेले. मात्र आज त्या ठिकाणी पाईपच दिसत नाहीत. हे पाईप गेले कुठे?, रस्ता दुरुस्त करण्याअगोदर अरुंद पुलांची कामे का झाली नाहीत, याकडे मात्र कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे आजही येथील अरुंद पुलावरुन वाहतूक सुरु आहे.पावसाळ्यानंतर दरवर्षी भुलेश्वर घाटात असणारी जंगली झाडे इतक्या जास्त प्रमाणात वाढतात, की झाडांच्या फांद्या पार रस्त्यावर येतात. यामुळे समोरची गाडी न दिसून आजपर्यंत एकदा नव्हे तर अनेकदा या घाटात अपघात झाले आहेत. मात्र प्रशासन याकडे लक्ष देणार तरी केव्हा? हा प्रश्न या घाटातून प्रवास करणाºयांना पडला आहे. भुलेश्वर घाटाच्या वर असणाºया माळशिरस, टेकवडी, पोंढे या गावांना यवत या गावी दळणवळण करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, तर घाटाच्या वरील बाजूला असणारे भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी शिल्पकला अभ्यासक, पर्यटक, भुलेश्वरभक्त याठिकाणी सतत येत असतात. पुण्यापासून ७0 किलोमीटरवर भुलेश्वर मंदिर आहे. यामुळे बहुतांश भाविक भुलेश्वरला येण्यासाठी याच घाटाचा वापर करतात. यामुळे हा घाट सुरक्षित असणे गरजेचे आहे.भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली असल्याने बुजलेल्या चाºया व रस्त्यावरील आलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली होती. ती त्वरित काढणे गरजेचे होते. यामुळे वारंवार अपघात होत होते. परंतु चारीमधील झाडे काढल्याने आता सुखद प्रवास होणार आहे.- मस्कू शेंडगे,अध्यक्ष, लहूजी शक्ती सेनाकठड्यांच्या दुरुस्तीची गरज१९७२मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना या घाटाचे काम करण्यात आले. त्यावेळेस दगडगोट्यांमध्ये कच्चे साईड कठडे बांधण्यात आले. आजतागायत त्याकडे कोणीही पाहिले नाही. अनेक ठिकाणी कठडे ढासळलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी वाहून जाणाºया चाºया मोकळ्या करणे गरजेचे आहे.काही ठिकाणी खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील भाविकांनी केली होती. त्यानुसार नववर्षाच्या पूर्वसंध्येला चारीमधील झाडी काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अपघातग्रस्त घाटाने मोकळा श्वास घेतला आहे. लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मस्कू शेंडगे यांनी पाच महिने संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.

टॅग्स :Puneपुणे