शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पाणी आल्याचा ‘भोंगा’

By admin | Updated: April 26, 2017 02:47 IST

गावात पाणी सोडल्याचे कळविण्यासाठी ग्रामपंचायतीवर ‘भोंगा’ बसवण्यात आलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव

इंदापूर : गावात पाणी सोडल्याचे कळविण्यासाठी ग्रामपंचायतीवर ‘भोंगा’ बसवण्यात आलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव ग्रामपंचायतीला तब्बल पाच वर्षांपासून गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत सोडून कमालीची कसरत करावी लागत आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर शहराच्या पश्चिमेला २० किमी अंतरावर पळसदेव हे गाव आहे. तालुक्यातील प्रमुख व मोठी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणाऱ्या पळसदेव गावची लोकसंख्या ७ हजार २५८ एवढी आहे. १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. काळेवाडी, बांडेवाडी, शिंदेवस्ती, माळेवाडी शेलारपट्टा, येडेवस्ती या वाड्यावस्त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. उजनी जलाशयाजवळ असणाऱ्या या गावात ५ ओढे, १० बंधारे, ४ तलाव, खडकवासला कालवा अशी सिंचनासाठी उत्तम सोय आहे. मात्र काळ्या पाषाणामध्ये वसलेल्या या गावात उजनी पाणलोट क्षेत्राच्या नजिक विहीर खोदाई केली तरी त्या विहिरीमध्ये पाणी पाझरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाणलोट क्षेत्रात गाव असल्याने टँकर मागणीच्या प्रस्तावातील अटीशर्तींमध्ये ते बसत नसल्याने, शासकीय टँकर मिळत नाही, हे दुखणे आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना येथील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव बनसुडे म्हणाले, की तीव्र उन्हाळ्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी घटू लागली आहे. पाणलोट क्षेत्रातील विहिरीचे पाणी गावातील विहिरींमध्ये टाकून तेथून गावाला पाणीपुरवठा करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाला करावे लागते आहे. ही कसरत करण्याऐवजी पाणलोट क्षेत्रात जलवाहिनी टाकून थेट गावातील विहिरीत पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजूरीसाठी पाठवला आहे. त्यासाठी किमान एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. शासनाने ही योजना मंजूर केल्यास पाणी पुरवठ्याचा ताण कमी होणार आहे.तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने आदींनी या भागातील शेतीसाठी खडकवासला कालव्यामधून पाणी देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. सध्या मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होऊ लागला आहे.लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून पळसदेव गावात जलशुद्धीकरण यंंत्रणा बसविण्यात आली आहे. पाण्याचे ‘एटीएम कार्ड’ देण्यात आले आहे.दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली नाही. विंधन विहिरीद्वारे तेथे पाणीपुरवठा केला जातो.