शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आल्याचा ‘भोंगा’

By admin | Updated: April 26, 2017 02:47 IST

गावात पाणी सोडल्याचे कळविण्यासाठी ग्रामपंचायतीवर ‘भोंगा’ बसवण्यात आलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव

इंदापूर : गावात पाणी सोडल्याचे कळविण्यासाठी ग्रामपंचायतीवर ‘भोंगा’ बसवण्यात आलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव ग्रामपंचायतीला तब्बल पाच वर्षांपासून गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत सोडून कमालीची कसरत करावी लागत आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर शहराच्या पश्चिमेला २० किमी अंतरावर पळसदेव हे गाव आहे. तालुक्यातील प्रमुख व मोठी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणाऱ्या पळसदेव गावची लोकसंख्या ७ हजार २५८ एवढी आहे. १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. काळेवाडी, बांडेवाडी, शिंदेवस्ती, माळेवाडी शेलारपट्टा, येडेवस्ती या वाड्यावस्त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. उजनी जलाशयाजवळ असणाऱ्या या गावात ५ ओढे, १० बंधारे, ४ तलाव, खडकवासला कालवा अशी सिंचनासाठी उत्तम सोय आहे. मात्र काळ्या पाषाणामध्ये वसलेल्या या गावात उजनी पाणलोट क्षेत्राच्या नजिक विहीर खोदाई केली तरी त्या विहिरीमध्ये पाणी पाझरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाणलोट क्षेत्रात गाव असल्याने टँकर मागणीच्या प्रस्तावातील अटीशर्तींमध्ये ते बसत नसल्याने, शासकीय टँकर मिळत नाही, हे दुखणे आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना येथील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव बनसुडे म्हणाले, की तीव्र उन्हाळ्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी घटू लागली आहे. पाणलोट क्षेत्रातील विहिरीचे पाणी गावातील विहिरींमध्ये टाकून तेथून गावाला पाणीपुरवठा करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाला करावे लागते आहे. ही कसरत करण्याऐवजी पाणलोट क्षेत्रात जलवाहिनी टाकून थेट गावातील विहिरीत पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजूरीसाठी पाठवला आहे. त्यासाठी किमान एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. शासनाने ही योजना मंजूर केल्यास पाणी पुरवठ्याचा ताण कमी होणार आहे.तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने आदींनी या भागातील शेतीसाठी खडकवासला कालव्यामधून पाणी देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. सध्या मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होऊ लागला आहे.लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून पळसदेव गावात जलशुद्धीकरण यंंत्रणा बसविण्यात आली आहे. पाण्याचे ‘एटीएम कार्ड’ देण्यात आले आहे.दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली नाही. विंधन विहिरीद्वारे तेथे पाणीपुरवठा केला जातो.