शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

भोई प्रतिष्ठानचा उपक्रम : आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:13 IST

कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे.

पुणे : कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना दिवाळीसाठी पुण्यात आणण्यात आले आहे.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना या प्रकल्पांतर्गत आधार दिला जात आहे. सर्व कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलांना शालेय वस्तू, कपडे, शाळेची फी या सर्व गोष्टींचे आर्थिक साह्य केले जाते. कुटुंबातील मुलांना नांदेड भागातील आवडत्या शाळेत प्रवेश मिळवून देतात.दिवाळीची सुटी लागली की, अनेक मुले मामाच्या गावाला जाऊन सुटीचा आनंद घेतात. काहीजण बाहेरगावी फिरायला जातात. त्याचप्रमाणे या शेतकरी कुटुंबातील मुलांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पुण्यातील १४ कुटुंबांनी ही जबाबदारी घेतली आहे. पुण्यातील कल्याणीनगर, लोहगाव, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, कोथरूड, सोमवार पेठ, गणेश पेठ, धनकवडी या भागातील ही कुटुंबं आहेत. हे सर्व जण शेतकरी कुटुंबातील मुलांना स्वत:च्या घरी आणतात. जवळपास पंधरा दिवस सुटीचा आनंद या मुलांना मिळतो. सुटीत मुलांना कपडे घेऊन देणे, फराळ देणे, किल्ले तयार करण्यास मदत करणे, फिरायला घेऊन जाणे अशा प्रकारे सुटीचे पंधरा दिवस त्यांना आनंदित केले जाते. तसेच, या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना पुण्यात या दिवाळी सणाचा आनंद लुटता येतो. भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सागर पवार, सुनीत परदेशी, मनोज रानडे, राधिका मखमले, कल्पना उनवणे, संगीता चौरे, अनिता पोटे, सुजाता कोतवाल, माधुरी जाधव, अजय शिंदे, वर्षा साबळे, राजेश जाधव, अजय बल्लाळ, मानसी रानडे या कुटुंबांमध्ये सध्या अर्धापुरातील आत्महत्याग्रस्त कुटुंबं दिवाळी साजरी करीत आहेत.मुन्नी मांजरे यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची शेती असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर चुलते ही शेती सांभाळत आहेत. तसेच, पतीचे वडील आणि भाऊ कुटुंबाकडे लक्ष देतात.मंगल इंगोले यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची अर्धा एकर शेती होती. त्या सध्या माहेरी राहत आहेत.सुनीता कदम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पतीच्या एक एकर शेतीचा कारभार पतीचे भाऊ पाहतात.लक्ष्मी क्षीरसागर चार मुले आहेत. त्यांनी आपल्या पतीनंतर, एक एकर शेती इतर लोकांना पाहण्यासाठी दिली आहे.लक्ष्मी साखरे यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांची शेती सासू-सासरे पाहतात, तर त्या माहेरी राहत आहेत.वर्षा इंगोले यांना दोन मुले असून, त्यांचे शेतीवरच घर चालते.पुष्पा कदम यांना दोन मुली आहेत. त्यांची दीड एकर शेती त्यांचे चुलते करीत आहेत.सरस्वती कदम यांना तीन मुली आहेत. त्यांची शेती सासरे पाहतात.विजयमाला देशमुख यांना दोन मुलं आहेत. त्या पती निधनानंतर माहेरी राहत आहेत.मनकर्ण कदम यांना तीन मुली, एक मुलगा आहे. त्यांनी स्वत:ची दोन एकरची शेती दुसऱ्याला कसण्यासाठी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणे