शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भोई प्रतिष्ठानचा उपक्रम : आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:13 IST

कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे.

पुणे : कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना दिवाळीसाठी पुण्यात आणण्यात आले आहे.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील १७ कुटुंबांना या प्रकल्पांतर्गत आधार दिला जात आहे. सर्व कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलांना शालेय वस्तू, कपडे, शाळेची फी या सर्व गोष्टींचे आर्थिक साह्य केले जाते. कुटुंबातील मुलांना नांदेड भागातील आवडत्या शाळेत प्रवेश मिळवून देतात.दिवाळीची सुटी लागली की, अनेक मुले मामाच्या गावाला जाऊन सुटीचा आनंद घेतात. काहीजण बाहेरगावी फिरायला जातात. त्याचप्रमाणे या शेतकरी कुटुंबातील मुलांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पुण्यातील १४ कुटुंबांनी ही जबाबदारी घेतली आहे. पुण्यातील कल्याणीनगर, लोहगाव, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, कोथरूड, सोमवार पेठ, गणेश पेठ, धनकवडी या भागातील ही कुटुंबं आहेत. हे सर्व जण शेतकरी कुटुंबातील मुलांना स्वत:च्या घरी आणतात. जवळपास पंधरा दिवस सुटीचा आनंद या मुलांना मिळतो. सुटीत मुलांना कपडे घेऊन देणे, फराळ देणे, किल्ले तयार करण्यास मदत करणे, फिरायला घेऊन जाणे अशा प्रकारे सुटीचे पंधरा दिवस त्यांना आनंदित केले जाते. तसेच, या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना पुण्यात या दिवाळी सणाचा आनंद लुटता येतो. भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सागर पवार, सुनीत परदेशी, मनोज रानडे, राधिका मखमले, कल्पना उनवणे, संगीता चौरे, अनिता पोटे, सुजाता कोतवाल, माधुरी जाधव, अजय शिंदे, वर्षा साबळे, राजेश जाधव, अजय बल्लाळ, मानसी रानडे या कुटुंबांमध्ये सध्या अर्धापुरातील आत्महत्याग्रस्त कुटुंबं दिवाळी साजरी करीत आहेत.मुन्नी मांजरे यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची शेती असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर चुलते ही शेती सांभाळत आहेत. तसेच, पतीचे वडील आणि भाऊ कुटुंबाकडे लक्ष देतात.मंगल इंगोले यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वत:ची अर्धा एकर शेती होती. त्या सध्या माहेरी राहत आहेत.सुनीता कदम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पतीच्या एक एकर शेतीचा कारभार पतीचे भाऊ पाहतात.लक्ष्मी क्षीरसागर चार मुले आहेत. त्यांनी आपल्या पतीनंतर, एक एकर शेती इतर लोकांना पाहण्यासाठी दिली आहे.लक्ष्मी साखरे यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांची शेती सासू-सासरे पाहतात, तर त्या माहेरी राहत आहेत.वर्षा इंगोले यांना दोन मुले असून, त्यांचे शेतीवरच घर चालते.पुष्पा कदम यांना दोन मुली आहेत. त्यांची दीड एकर शेती त्यांचे चुलते करीत आहेत.सरस्वती कदम यांना तीन मुली आहेत. त्यांची शेती सासरे पाहतात.विजयमाला देशमुख यांना दोन मुलं आहेत. त्या पती निधनानंतर माहेरी राहत आहेत.मनकर्ण कदम यांना तीन मुली, एक मुलगा आहे. त्यांनी स्वत:ची दोन एकरची शेती दुसऱ्याला कसण्यासाठी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणे