शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

भीमा स्वच्छ, सुंदर करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:00 AM

भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथून नमामी चंद्रभागा यात्रेला डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते सुरुवात झाली. नदी ही राष्टीय संपत्ती असून तिच्या प्रदूषणामुळे दुष्काळ व पूर या घटना घडू लागल्या आहेत. पूर व दुष्काळमुक्त आणि समृद्ध भारत करण्यासाठी सामान्य माणसांना, विशेषत: पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदी संवाद जल साक्षरता यात्रा आयोजित केली होती.या वेळी जलतज्ज्ञ अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सरपंच दीपक चिमटे, ग्राम परिस्थितिकी विकास समितीचे अध्यक्ष मारुती लोहकरे, सहायक उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे, तहलीसदार सुनील जोशी आदी उपस्थित होते. या वेळी ‘नमामी चंद्रभागा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.नमामी चंद्रभागा मोहिमेत भीमेच्या कडेला राहणाºया लोकांनी ही नदी स्वच्छ करण्याचे ठरविले पाहिजे. जमिनी, डोंगरांना हिरवेगार बनविण्यासाठी नदीची पवित्रता टिकली पाहिजे, यासाठी सर्वांनी संकल्प करा. प्रथम भीमा नदीचा उगम असलेले भीमाशंकर गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा निश्चय या वेळी करा, असे आवाहन त्यांनी केले.१०१ यात्रांचे समायोजनभीमा नदीचा संगम असलेल्या विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार आहे.या यात्रेत चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीचे पाणी समाविष्ट होणार असून, या नमामी चंद्रभागा यात्रेची सुरुवात आज (दि. ७) भीमाशंकर येथून झाली. ही यात्रा भीमेच्या उगमापासून संगमापर्यंत जाणार आहे.पुढच्या पिढीला सुखी करण्यासाठी ही जंगले, जंगलातील प्राणी वाचणे जरुरीचे आहे. जंगल पाण्याचे वडील आहेत; तर जमीन, नद्या ही पाण्याची आई आहे. पाणी नसेल तर आपण राहणार नाही. त्यासाठी पाण्याच्या आई-वडिलांना जपले पाहिजे. भीमाशंकरची हिरवी गर्मी ही निळ्या गर्मीला खेचून घेते व त्यातून पाऊस पडतो. जर, येथील जंगल राहिले नाही, तर पाउस पडणार नाही व पाऊस पडला नाही, तर नदी वाहणार नाही व शेतीला पाणी मिळणार नाही.- डॉ. राजेंद्रसिंह,जलतज्ज्ञ