शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातलागवड संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:01 IST

पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते.

ठळक मुद्देआंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ

तळेघर : गेले दहा ते बारा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने दडी मारल्यामुळे भातरोपांच्या लागवडी रखडल्या असून, आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यातला परिसर भातशेतीचे आगार समजला जातो. येथील आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यांतून भात एकमेव पीक काढतो. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवांनी ह्या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या कात्र्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत तर काही ठिकाणी चिडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. वरुणराजाने पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु पुनर्वसू (कोर) थोरल्या नक्षत्रांच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडीयोग्य होताच आदिवासी शेतकºयांनी भातरोपांच्या लागवडी सुरू केल्या. परंतु गेले दहा ते बारा दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भातलागवडी रखडल्या असून आदिवासी बांधव चिंंताग्रस्त झाला आहे. भातरोपे लागवडीसाठी लागणारा चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे  काही शेतकरी विहिरी बंधाऱ्यांतून इंजिनाद्वारे पाणी घेऊन भातलागवडी करत आहेत. परंतु लागवड केलेल्या भातरोपांचे काय, असे प्रश्न्नचिन्ह आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. परंतु गेले कित्येक वर्षांपासून या भागामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात आहे. वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ जात आहेत.

टॅग्स :ambegaonआंबेगावFarmerशेतकरीRainपाऊस