शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भरून न येणा-या जखमतेून अजूनही सावरतंय माळीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:35 IST

एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता

- नीलेश काण्णव ।घोडेगाव : एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. त्याला उद्या ३० जुलैला बरोबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेले असले तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही पूर्णत: मिटलेल्या नाहीत, हे माळीणवासींयांना भेटल्यावर जाणवत राहते. या दुर्घटनेला उद्या ३० जुलै २०१७ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.३० जुलै २०१४ ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगाºयाखाली गाडले गेले आणि या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. दुर्घटनेतून वाचलेले माळीण ग्रामस्थ नवीन बांधण्यात आलेल्या गावठाणात राहत असले तरी येथे पहिल्याच पावसात भराव खचून झालेले नुकसान पाहून हे पुन्हा भयभीत झाले होते. माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाºयाखाली सापडून मृत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्टीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाºयाचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. तसेच दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले व कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली. नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व बारा मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. मात्र यांनाही नवीन गावठाणात घर मिळाले. पहिल्याच पावसातनव्या गावाची दैनामात्र दि. २४ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नवीन गावाची दैना उडाली. ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेले, रस्ते खचले, रस्त्यांना तडे गेले, घरांच्या पायºया खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले, तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला धोका निर्माण झाला.सात कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या घरातपहिल्या पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, भिंतींना तडे गेल्याने या मोठमोठ्या बांधलेल्या आरसीसी भिंती घरांवर पडल्या, तर पुन्हा गावावर मोठे संकट येऊ शकते किंवा भराव खचू लागल्याने घरेही खचतील, या भीतीने काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची तयारी करू लागले. यातील सात कुटुंबे पत्र्याच्या शेडवर राहायलादेखील गेली आहेत.उर्वरित कामे पावसाळ््यानंतरचप्रशासनाने तत्काळ दखल घेत खचलेले भराव भरले, नवीन गटारे बांधली, रस्ते दुरुस्त करून घेतले, लाईटचे पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरू करून दिला, पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र यातील अनेक कामे पावसाळा संपल्याशिवाय करता येणार नाहीत. यामध्ये पक्के रस्ते बांधणे, नवीन पायºया करणे, घरांपुढील खचलेल्या पायºया करणे ही कामे पावसाळा संपल्याबरोबर सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.नव्या माळीणपुढचे सवाल :सपाटीकरण करण्यासाठी खालची जमीन मोठ्या प्रमाणात खोदली गेली व नवीन सुमारे ८ ते १० मीटर उंचीचे भराव केले गेले. हे भराव खचू शकतात, ही बाब प्रकल्प सल्लागारांच्या लक्षात का आली नाही?थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्येनक्की काय झाले?मातीवरच पायºया बांधल्यानेत्या खचल्या. यात दोषी कोण?