शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भरून न येणा-या जखमतेून अजूनही सावरतंय माळीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:35 IST

एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता

- नीलेश काण्णव ।घोडेगाव : एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. त्याला उद्या ३० जुलैला बरोबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेले असले तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही पूर्णत: मिटलेल्या नाहीत, हे माळीणवासींयांना भेटल्यावर जाणवत राहते. या दुर्घटनेला उद्या ३० जुलै २०१७ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.३० जुलै २०१४ ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगाºयाखाली गाडले गेले आणि या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. दुर्घटनेतून वाचलेले माळीण ग्रामस्थ नवीन बांधण्यात आलेल्या गावठाणात राहत असले तरी येथे पहिल्याच पावसात भराव खचून झालेले नुकसान पाहून हे पुन्हा भयभीत झाले होते. माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाºयाखाली सापडून मृत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्टीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाºयाचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. तसेच दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले व कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली. नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व बारा मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. मात्र यांनाही नवीन गावठाणात घर मिळाले. पहिल्याच पावसातनव्या गावाची दैनामात्र दि. २४ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नवीन गावाची दैना उडाली. ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेले, रस्ते खचले, रस्त्यांना तडे गेले, घरांच्या पायºया खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले, तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला धोका निर्माण झाला.सात कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या घरातपहिल्या पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, भिंतींना तडे गेल्याने या मोठमोठ्या बांधलेल्या आरसीसी भिंती घरांवर पडल्या, तर पुन्हा गावावर मोठे संकट येऊ शकते किंवा भराव खचू लागल्याने घरेही खचतील, या भीतीने काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची तयारी करू लागले. यातील सात कुटुंबे पत्र्याच्या शेडवर राहायलादेखील गेली आहेत.उर्वरित कामे पावसाळ््यानंतरचप्रशासनाने तत्काळ दखल घेत खचलेले भराव भरले, नवीन गटारे बांधली, रस्ते दुरुस्त करून घेतले, लाईटचे पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरू करून दिला, पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र यातील अनेक कामे पावसाळा संपल्याशिवाय करता येणार नाहीत. यामध्ये पक्के रस्ते बांधणे, नवीन पायºया करणे, घरांपुढील खचलेल्या पायºया करणे ही कामे पावसाळा संपल्याबरोबर सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.नव्या माळीणपुढचे सवाल :सपाटीकरण करण्यासाठी खालची जमीन मोठ्या प्रमाणात खोदली गेली व नवीन सुमारे ८ ते १० मीटर उंचीचे भराव केले गेले. हे भराव खचू शकतात, ही बाब प्रकल्प सल्लागारांच्या लक्षात का आली नाही?थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्येनक्की काय झाले?मातीवरच पायºया बांधल्यानेत्या खचल्या. यात दोषी कोण?