शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खासदार संजय सिंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे 'भारतीय झगडा पार्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:35 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल दोन राज्यांमध्ये भांडणे लावणारी वक्तव्ये करतात....

धनकवडी (पुणे) : गुजरातमध्ये भाजपचे लोक विषारी दारूचे गुत्ते चालवतात. मेघालयामध्ये हेच लोक वेश्यालये चालवतात. सात्त्विकतेचा आव आणणारे महाराष्ट्राचे राज्यपाल दोन राज्यांमध्ये भांडणे लावणारी वक्तव्ये करतात. भाजपचे लोक रोजगार, महागाई यांसारखे देशासमोरील मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावण्याचे काम करतात. ‘भारतीय जनता पार्टी’ म्हणजे ‘भारतीय झगडा पार्टी’ असून त्यांना सत्तेतून खाली खेचले पाहिजे, अशी टीका करत आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी पुण्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्यावतीने पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात महाराष्ट्र युवा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरलेल्या सभागृहात ‘आप’ खासदार संजय सिंग यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणावर जोरदार घणाघात केला.

यावेळी राज्य संघटक विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, राज्य समिती सदस्य जगजीत सिंग, देवेंद्र वानखेडे, संदीप देसाई उपस्थित होते.

यावेळी आपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते रंगा राचुरे म्हणाले, मंडईतील टाेमॅटो-बटाट्याप्रमाणे महाराष्ट्रात आमदारांची खरेदी-विक्री झाली. आमदार ५० कोटीला विकले गेले. शेतकऱ्यांसाठी असलेली पंतप्रधान विमा योजना आज ‘पंतप्रधान मान्यताप्राप्त मटका’ योजना झाली आहे. लाखो लोकांनी आज रस्त्यावर उतरून सरकारला या प्रश्नी जाब विचारला पाहिजे.

यावेळी दिल्ली विधानसभेतील आमदार कुलदीप कुमार, प्रभारी दीपक सिंगला यांनीही आपली भूमिका मांडली. संजय सिंग यांच्या भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. ‘जो सरकार निकम्मी है, आे सरकार बदलनी है!’ यासारख्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. महेश स्वामी यांनी आभार मानले.

टॅग्स :AAPआपBJPभाजपा