शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

भरतगाव ग्रामपंचायतीत थोरात गटाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:04 IST

यवत: भरतगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला असून ९ पैकी थोरात गटाचे ...

यवत: भरतगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला असून ९ पैकी थोरात गटाचे ५ तर कुल गटाचे ४ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. सलग चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत थोरात गटाने येथे विजय मिळविला आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील थोरात गटाने भरतगावमध्ये बहुमत मिळविले होते. मात्र ग्रामपंचायत कारभारात अनेक राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन सरपंच रेखा जाधव यांना सरपंचपद गमवावे लागले होते. कुल गटाचे विलास जगदाळे यांना त्यावेळी उपसरपंच पद मिळाले होते तर विकास हाके यांच्याकडे काही काळासाठी सरपंचपदाची जबाबदारी आली होती.

यंदाच्या निवडणुकीत थोरात गटाने परत मोर्चेबांधणी करत ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहिलेले तात्यासाहेब ताम्हाणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.

वार्ड क्रमांक १ मध्ये सलग चौथ्या वेळेस कुल गटाचे माजी उपसरपंच विलास जगदाळे प्रतिष्ठा पणाला लागली होती.या वार्डात तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होती मात्र जगदाळे यांनी प्रतिष्ठा जपत विरोधी गटाला धोबीपछाड देत वार्डात परत एकदा विजय मिळविला. तीनही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी केले. येथे साधना विलास जगदाळे, अजित जिजाबा थोरात व अक्षय अनंता ताम्हाणे हे विजयी झाले.

वार्ड क्रमांक २ मध्ये देखील निवडणुकीत चुरस होती. येथील तीनपैकी एका जागेवर कुल गट तर दोन जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. कुल गटाच्या उत्तम किसन टेमगिरे तर थोरात गटाच्या मनीषा सुभाष टेमगिरे, नीलम रवींद्र इंगळे हे उमेदवार विजयी झाले.

वार्ड क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा किसन हाके या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. तर दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने ग्रामपंचायतीवर थोरात गटाच्या सत्तेचे शिक्कामोर्तब झाले.थोरात गटाच्या सुप्रिया सावळाराम हाके व शंकर बाळासो जगदाळे यांनी विजय मिळविला.

पंचायत समिती गणातील तीनही गावात थोरात गटाची सत्ता

यवत पंचायत समिती गणात असलेल्या यवत, कासुर्डी व भरतगाव या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थोरात गटाने बाजी मारली असून येथे राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. यामुळे या महत्त्वाच्या पंचायत समिती गणात कुल गटाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी तीनही ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी केवळ एक जागा थोरात गटाची जास्त असल्याने काठावरचे बहुमत मिळाले आहे.

२३ यवत

विजयी उमेदवारांसह जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.