शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भरतगाव ग्रामपंचायतीत थोरात गटाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:04 IST

यवत: भरतगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला असून ९ पैकी थोरात गटाचे ...

यवत: भरतगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला असून ९ पैकी थोरात गटाचे ५ तर कुल गटाचे ४ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. सलग चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत थोरात गटाने येथे विजय मिळविला आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील थोरात गटाने भरतगावमध्ये बहुमत मिळविले होते. मात्र ग्रामपंचायत कारभारात अनेक राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन सरपंच रेखा जाधव यांना सरपंचपद गमवावे लागले होते. कुल गटाचे विलास जगदाळे यांना त्यावेळी उपसरपंच पद मिळाले होते तर विकास हाके यांच्याकडे काही काळासाठी सरपंचपदाची जबाबदारी आली होती.

यंदाच्या निवडणुकीत थोरात गटाने परत मोर्चेबांधणी करत ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहिलेले तात्यासाहेब ताम्हाणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.

वार्ड क्रमांक १ मध्ये सलग चौथ्या वेळेस कुल गटाचे माजी उपसरपंच विलास जगदाळे प्रतिष्ठा पणाला लागली होती.या वार्डात तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होती मात्र जगदाळे यांनी प्रतिष्ठा जपत विरोधी गटाला धोबीपछाड देत वार्डात परत एकदा विजय मिळविला. तीनही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी केले. येथे साधना विलास जगदाळे, अजित जिजाबा थोरात व अक्षय अनंता ताम्हाणे हे विजयी झाले.

वार्ड क्रमांक २ मध्ये देखील निवडणुकीत चुरस होती. येथील तीनपैकी एका जागेवर कुल गट तर दोन जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. कुल गटाच्या उत्तम किसन टेमगिरे तर थोरात गटाच्या मनीषा सुभाष टेमगिरे, नीलम रवींद्र इंगळे हे उमेदवार विजयी झाले.

वार्ड क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा किसन हाके या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. तर दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने ग्रामपंचायतीवर थोरात गटाच्या सत्तेचे शिक्कामोर्तब झाले.थोरात गटाच्या सुप्रिया सावळाराम हाके व शंकर बाळासो जगदाळे यांनी विजय मिळविला.

पंचायत समिती गणातील तीनही गावात थोरात गटाची सत्ता

यवत पंचायत समिती गणात असलेल्या यवत, कासुर्डी व भरतगाव या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थोरात गटाने बाजी मारली असून येथे राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. यामुळे या महत्त्वाच्या पंचायत समिती गणात कुल गटाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी तीनही ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी केवळ एक जागा थोरात गटाची जास्त असल्याने काठावरचे बहुमत मिळाले आहे.

२३ यवत

विजयी उमेदवारांसह जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.