शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

शंभरीनंतरही भारत सेवक समाज अजून कार्यरत : गोपाळ कृष्ण गोखलेंची स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:46 IST

अर्थशास्त्रावरील ज्यांच्या भाषणांची त्या काळात इंग्लडमधील खासदारही प्रतिक्षा करत असत त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५३ जयंती आज आहे.

ठळक मुद्देदेशभरातील सर्व शाखा सक्रिय १२ जून १९०५ रोजी स्थापन केलेल्या भारत सेवक समाज अजूनही अविरत कार्यरत हे वैशिष्ट्यपूर्ण

राजू इनामदारपुणे: अवघ्या पन्नास वर्षांचे आयुष्य, मात्र तेवढ्या कालावधीत त्यांनी देशातच नाही तर देशाबाहेरही लौकिक मिळवला. भारत सेवक समाज सारखी संस्था स्थापन केली. अर्थशास्त्रावरील ज्यांच्या भाषणांची त्या काळात इंग्लडमधील खासदारही प्रतिक्षा करत असत त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५३ जयंती गुरूवारी आहे. त्यांनीच सन १९०५ मध्ये स्थापन केलेल्या भारत सेवक समाज संस्थेच्या देशभरातील सर्व शाखा अजूनही उत्तर प्रकारे सक्रिय असून तिथे गोखले यांची जयंती साजरी होत आहे.अठराव्या वर्षी बी. ए.,  २० व्या वर्षी प्रोफेसर, २१ व्या वर्षी पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस, २४ व्या वर्षी सभेच्या त्रैमासिकाचे संपादक, २९ व्या वर्षी काँग्रेसचे चिटणीस, ३४ व्या वर्षी प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य, ३६ व्या वर्षी वरिष्ठ कायदे मंडळाचे सदस्य, ३८ व्या वर्षी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ४० व्या वर्षी भारत सेवक समाज संस्थेची स्थापना. अशी लखलखती कारकिर्द असलेल्या गोखले यांची पुणे ही कर्मभूमी. पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनामिक्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे उचित स्मारक झाले आहे. मात्र,  त्यापेक्षाही गोखले यांनी १२ जून १९०५ रोजी स्थापन केलेल्या भारत सेवक समाज अजूनही अविरत कार्यरत आहे हे वैशिष्ट्यपुर्ण आहे.फक्त पुण्यात किंवा राज्यातच नाही तर तमीळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, ओरिसा, उत्तराचंल, कर्नाटक अशा अनेक राज्यात भारत सेवक समाज कार्यरत आहे. देशाच्या सेवेसाठी म्हणून संस्थेचे आजीवन सदस्य घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत व्हायचे असा उद्देश ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली. आज ११४ वर्षानंतरही ही संस्था व तिच्या सर्व शाखा उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. त्या गोखले यांच्या दुरदृष्टीमुळेच! गोखले अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून उत्तर आयुष्यात प्रसिद्धीला आले. अर्थशास्त्रावर त्यांनी केलेली भाषणे देशात, परदेशात गाजली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी भारत सेवक समाजाने शाळा, महाविद्यालये तसेच अर्थशास्त्राचा अभ्यास देशहिताच्या दृष्टिने करणाºया संस्था स्थापन केल्या.पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्येच आज  देशभरातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी पदव्यूत्तर अर्थशास्त्राचे संशोधन करत आहेत. भारत सेवक समाजाचे दहा जणांचे कार्यकारी मंडळ आहे. ओरिसा येथील साहू संस्थेचे अध्यक्ष आहेत. मिलिंद देशमूख चिटणीस आहेत. सर्वसाधारण सदस्यांची संख्या बरीच असून ते देशभरात विखूरलेले आहेत. त्यांची सर्वसाधारण सभा व दहा जणांच्या कार्यकारी मंडळाची आढावा तसेच नियोजन बैठक दरवर्षी जूनमध्ये होत असते. संस्थेच्या देशभरातील ५०० कर्मचाºयांच्या वेतनासाठी केंद्र सरकारचे अनुदान आहे. देखभाल दुरूस्तीचा खर्च मात्र संस्थेला करावा लागतो. संस्थेकडे असलेल्या ठेवींच्या व्याजावरून तो केला जातो. गोखले यांनी त्यांच्या हयातीतच संस्था आर्थिक दृष्ट्या सुस्थिर करून दिली. त्यासाठी संस्थेच्या नावावर अनेक जागा खरेदी केल्या. त्यासाठीचा खर्च स्वत: केला. देशात, परदेशात असे त्यांचे सतत भ्रमण चालत असे. अखेरची काही वर्षे ते भारत सेवक समाजाच्या आवारात वास्तव्यास होते. तिथे त्यांचे निवासस्थान राज्य सरकारने दिलेल्या २५ लाख रूपयांच्या अनुदानातून जतन करण्यात आले आहे. तिथेच त्यांच्या छायाचित्रांचे एक चांगले संग्रहालय केले जात आहे. 

टॅग्स :Puneपुणे