शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 00:53 IST

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील.

आव्हाळवाडी : कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीसह सर्व सेवांच्या नियोजनाचा आराखडाही प्रशासनाने तयार केला आहे.१ जानेवारीला कोरेगाव व परिसरात झालेल्या दंगलीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेत सुसज्ज तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार : यावर्षी १० पटीने जास्त पोलीस बंदोबस्त आहे. यात ४२५ अधिकारी, ५००० पोलीस कर्मचारी, १२ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, ५ वरुण तर ५ वज्र वाहने, १२०० होमगार्ड व निमलष्करी जवानांसह मोठा पोलीस बंदोबस्त आहे. गोपनीय माहितीसाठी साध्या वेशात अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे. येथील प्रत्येक हालचालीवर निगराणीसाठी ४० कॅमेरे, १२ ड्रोन कॅमेरे, ३०० सीसीटीव्ही, तसेच १५ इमारती, तसेच ५ ठिकाणी वॉच टॉवरवरून दुर्बिणीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. १५० पाण्याचे टँकर, ३६० फिरती स्वच्छतागृहे, २० अग्निशमन, १५ आरोग्य मदत केंद्रे, २३ रुग्णवाहिका यंत्रणा, १० क्रेन, २०० फायर रेझिस्टंट बलून्स, पी. ए. सिस्टीम अशा सुसज्ज यंत्रणाही सज्ज असणार आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर, लोणीकंद, पेरणे फाटा, वाघोली परिसरात मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध घालण्यात येणार आहेत. मात्र पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्यक साधने असणार आहेत.अंतर्गत वाहतुकीसाठी १०० बसेसएक जानेवारीला पुणे-नगर महामार्गावर पेरणे टोलनाका ते शिक्रापूरदरम्यान इतर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ३१ डिसेंबरपासूनच या टप्प्यात १०० पीएमपी बसेसच्या साह्याने विजयस्तंभापर्यंत अंतर्गत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मानवंदनेसाठी येणाºया वाहनांकरिता ११ ठिकाणी पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे.स्थानिकांकडून होणार स्वागत...दंगलीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने दोन महिन्यांत परिसरातील स्थानिक व्यापारी, तसेच ग्रामस्थांच्या २५० पेक्षा जास्त बैठका घेत सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न केले आहेत. या बैठकांमुळे स्थानिक नागरिकांतही बंधुत्वाची भावना जागृत झाली असून स्थानिक पदाधिकारी, व्यापारी, तसेच नागरिकांकडूनही मानवंदनेसाठी येणाºया बांधवांचे स्वागत पाणी व फुले देऊन केले जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणे