शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भामा-आसखेडमधील आवर्तनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:01 IST

बंंधाऱ्यांना आले पाणी : शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण

रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे व परिसरातील, सादल गाव बंधारे हे कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात पाणीसाठा कमी झाला होता. शेतकरी वर्गात शेतीला पाणी पुरेल का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या आठवड्यात भामा-आसखेड धरणामधून भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे आलेगाव पागा, आरंगाव, वडगाव बाढे या भागातील बंधाºयाला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाची दिवाळी या पाण्यामुळे गोड झाली आहे. यामुळे बंधाºयाच्या शेवटच्या पात्रातदेखील पाणी वाढल्याने सादल गाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटे, आलेगाव पागा, राक्षे वाडी, नागरगाव, रांजणगाव सांडस परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्हा व इतर सर्व जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा लवकरच दुष्काळ जाणवायला लागला होता. आलेगाव पागाचा बंधारा हा ऐन हिवाळ्यात कोरडा पडल्याने अडचणी उद्भवल्या होत्या. जिरायती भागाप्रमाणेच बागायती भागातही समस्या निर्माण झाली होती. यंदाच्या वर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यात भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली होती. गेल्या आठवड्यात सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्र भरत आहे. 

टॅग्स :Puneपुणे