शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

लाभार्थ्यांनी कर्जमंजुरीचे पत्र आॅनलाईन सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:00 IST

अर्जदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडील अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय संस्थेकडून/ बँकांकडून या योजनेअंतर्गत शासननिर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या लॉगिन आयडीद्वारे २३ मार्च २०१८ पर्यंत आॅनलाईन सादर करावे. 

ठळक मुद्दे आनंद कटके : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना सुरू.कर्जाची कमाल मर्यादा १७.६० लाख. जिल्हास्तरीय समिती मार्फत जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्ष्यांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. 

पुणे : राज्यात जलयुक्त शिवार अभियान/जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासन मृद व जल संधारण विभाग मंत्रालयाच्या शासननिर्णय क्र. जशिअ-२०१७/प्र.क्र. ५२२/ जल-७ दिनांक २ जानेवारी २०१८ अन्वये जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उत्खनन यंत्रसामग्री (अर्थमूव्हर्स) खरेदी करण्याकरिता वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८पर्यंत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी वित्तीय संस्थांकडून कर्जमंजुरीचे पत्र प्राप्त करून घेऊन आॅनलाईन सादर करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे.कटके यांनी सांगितले, की याअनुषंगाने प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महाआॅनलाईनद्वारे एसएमएसने यादी प्रसिद्ध केल्याबाबत कळविलेले आहे. पात्र अर्जदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडील अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय संस्थेकडून/ बँकांकडून या योजनेअंतर्गत शासननिर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या लॉगिन आयडीद्वारे २३ मार्च २०१८पर्यंत आॅनलाईन सादर करावे. कर्जाची कमाल मर्यादा १७.६० लाख कर्जमंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा १७.६० लाख रूपये राहील. तसेच त्यानुसार ५ वर्षांमध्ये शासनामार्फत कमाल व्याजपरतावा रक्कम ५.९० लाख रुपयांपर्यंत राहील, अशी अट वित्तीय संस्थेला मान्य असल्याचे नमूद असावे.तसेच, वित्तीय संस्थेचे कर्जमंजुरीचे पत्र सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची संख्या लक्ष्यांकापेक्षा जास्त असल्यास शासन निर्णयात नमूद जिल्हास्तरीय समिती मार्फत जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्ष्यांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. या योजनेसंबंधी अधिक व विस्तृत माहिती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण, पहिला मजला, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत,   ५, बी. जे. रोड, पुणे ४११००१ यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे  आवाहन जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेgovernment schemeसरकारी योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक