शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’

By admin | Updated: March 14, 2015 06:15 IST

अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .

शेलपिंपळगाव : अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला . शर्यतीवरी बंदी उठविण्यासाठी बैलगाडामालक व गाडाशौकिनानी तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकदिवसीय सामूहिक उपोषण केले. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपोषणासाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, राजगड, अलिबाग, मुरबाड आदी ठिकाणांहून बैलगाडामालक आळंदीत आले होते. शुक्रवारी पहाटे श्रीज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. समाधीचे दर्शन घेऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आमदार महेश लांडगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. ‘बंदी’मुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचे महत्त्व घटत चालले असून, शर्यतींच्या बैलांची किंमतही कमी होत आहे. विविध देव-देवतांच्या उत्सवाच्या निमित्त आयोजित या शर्यतींवर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. ‘बैलगाडा शर्यत बंदी’च्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात बदल करून शर्यती सुरू करू, असे सूतोवाच केले होते. मात्र, याला वर्ष उलटून गेले तरीही ठोस निर्णय घेतला नसल्याने गाडामालकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी, चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पसायदानाने लाक्षणिक सामूहिक उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)