शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’

By admin | Updated: March 14, 2015 06:15 IST

अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .

शेलपिंपळगाव : अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला . शर्यतीवरी बंदी उठविण्यासाठी बैलगाडामालक व गाडाशौकिनानी तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकदिवसीय सामूहिक उपोषण केले. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपोषणासाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, राजगड, अलिबाग, मुरबाड आदी ठिकाणांहून बैलगाडामालक आळंदीत आले होते. शुक्रवारी पहाटे श्रीज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. समाधीचे दर्शन घेऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आमदार महेश लांडगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. ‘बंदी’मुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचे महत्त्व घटत चालले असून, शर्यतींच्या बैलांची किंमतही कमी होत आहे. विविध देव-देवतांच्या उत्सवाच्या निमित्त आयोजित या शर्यतींवर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. ‘बैलगाडा शर्यत बंदी’च्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात बदल करून शर्यती सुरू करू, असे सूतोवाच केले होते. मात्र, याला वर्ष उलटून गेले तरीही ठोस निर्णय घेतला नसल्याने गाडामालकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी, चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पसायदानाने लाक्षणिक सामूहिक उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)