शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’

By admin | Updated: March 14, 2015 06:15 IST

अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .

शेलपिंपळगाव : अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला . शर्यतीवरी बंदी उठविण्यासाठी बैलगाडामालक व गाडाशौकिनानी तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकदिवसीय सामूहिक उपोषण केले. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपोषणासाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, राजगड, अलिबाग, मुरबाड आदी ठिकाणांहून बैलगाडामालक आळंदीत आले होते. शुक्रवारी पहाटे श्रीज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. समाधीचे दर्शन घेऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आमदार महेश लांडगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. ‘बंदी’मुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचे महत्त्व घटत चालले असून, शर्यतींच्या बैलांची किंमतही कमी होत आहे. विविध देव-देवतांच्या उत्सवाच्या निमित्त आयोजित या शर्यतींवर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. ‘बैलगाडा शर्यत बंदी’च्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात बदल करून शर्यती सुरू करू, असे सूतोवाच केले होते. मात्र, याला वर्ष उलटून गेले तरीही ठोस निर्णय घेतला नसल्याने गाडामालकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी, चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पसायदानाने लाक्षणिक सामूहिक उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)