शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

दर्जेदार शिक्षणासाठी ‘सिंबायोसिस’ची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

———————————— ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी २६ जानेवारी १९७१ रोजी सिंबायोसिस या संस्थेची स्थापना केली. ...

————————————

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी २६ जानेवारी १९७१ रोजी सिंबायोसिस या संस्थेची स्थापना केली. परदेशी विद्यार्थ्यांसाठी काही तरी केलं पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात पक्का होऊ लागला आणि सिंबायोसिस संस्थेची निर्मिती झाली.

सिंबायोसिसची लवळे आणि किवळे या ग्रामीण भागात २ विद्यापीठे असून, इंदोरमध्ये तिसरे विद्यापीठ आहे. ७० विविध संस्थांमध्ये भारतातील सर्व राज्यांमधून व ८५ देशांमधील ४०,००० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सिंबायोसिस दूरशिक्षण केंद्राचा भारतातील व परदेशातील २ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी लाभ घेतात. आनंदी गोपाळ यांची प्रेरणा आणि सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती मार्च २०१९ मध्ये डॉ. मुजुमदारांच्या आयुष्यात एक योगायोग अचानक जुळून आला. ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो सिनेमा त्यांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या ‘आनंदीचा’ वयाने तिच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळशी विवाह होतो. लग्नानंतर काही वर्षांनी आनंदी मुलाला जन्म देते. तिचे मूल आजारी पडते. एके दिवशी ते बाळ सतत रडू लागते, म्हणून वैद्याला बोलविण्यात येते. वैद्य येतो. त्यावेळी बाळ शांत झालेले असतं. वैद्य बाळाला तपासतो आणि बाळ देवाघरी गेल्याचं आनंदीला सांगतो. आनंदी उन्मळून जाते, रडते, आक्रोश करते आणि शेवटी आपण डॉक्टर असतो, तर कदाचित बाळ वाचले असते, ही तिची भावना होते. त्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी डॉक्टर होण्याची तिची जिद्द, त्यासाठी गोपाळने तिला केलेली अपरंपार मदत, आनंदीने अमेरिकेतल्या विद्यापीठात जाऊन मिळविलेली डॉक्टर पदवी, भारतात येऊन डॉक्टरचा व्यवसाय करण्याची तिची इच्छा आणि काही वर्षानंतर क्षयरोगाने तिचे झालेले निधन, या सिनेमातील सर्व घटना पाहून डॉ.मुजुमदार चकित झाले. देशाच्या इतिहासातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदी कायमची त्यांच्या लक्षात राहिली आणि सिंबायोसिसने केवळ मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, ही कल्पना त्यांच्या मनात जागरूक झाली. त्यानंतर केवळ ११ महिन्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळाली आणि १ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील पहिल्या व भारतातील तिसऱ्या ‘महिला वैद्यकीय महाविद्यालयाचे’ उद्घाटन झाले. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि गुणवत्तेवर आधारित असलेल्या पहिल्या ५ मुलींना ‘आनंदी गोपाळ’ शिष्यवृत्ती प्रदान केली असून त्यांचे सर्व शिक्षण मोफत होणार आहे. सिंबायोसिसने स्थापन केलेल्या ९०० बेडच्या रुग्णालयात १ जानेवारी २०२१ पासून येथे उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय डॉ. मुजुमदारांनी सिंबायोसिसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त घेतला आहे.

भारत सरकारने डॉ. मुजुमदार यांना २००५ मध्ये ‘पद्मश्री’ व २०१२ मध्ये ‘पद्मा भूषण’ सन्मान प्रदान केला. टिळक महाराष्ट्र विद्यपीठाने २०१६ मध्ये डी.लिट्. पदवी प्रदान करून सन्मानित केले. सन २०१६ मध्ये ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृती पुरस्काराने’ त्यांना गौरवण्यात आले आहे. पुण्यभूषण या व अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांच्या कारकिर्दीला झळाळी प्राप्त झाली आहे. या सर्व कार्यात डॉ.मुजुमदारांच्या मोठ्या कन्या डॉ.विद्या येरवडेकर आणि धाकट्या कन्या डॉ.स्वाती मुजुमदार मोठ्या ताकदीने त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असून संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

- उपेंद्र खाडिलकर