शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

चासकमानमधून रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:46 IST

५५० क्युसेकने विसर्ग सुरू; पिकांना होणार फायदा

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात ४५.९७ टक्के म्हणजेच केवळ ४.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून शुक्रवारी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून ५५० क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल ५७ दिवसांनंतर म्हणजेच २८ डिसेंबरला शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ४४.१२ टक्के म्हणजे ४.३० टीएमसी व उपयुक्त साठा व ३.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मागील वर्षी याच तारखेला ७.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलैला सोडण्यात आाले होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार ते सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. परंतु शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणीटंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याने २८ डिसेंबरला शुक्रवारी सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले होते.धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लकचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे तिसरे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे रब्बी आवर्तनाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, मिरची, बाजरी, ज्वारी आदींसह तरकारी पिकांना फायदा होऊन पिकांचे उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात पिकांना फायदा होणार आहे. सध्या धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पाणीपातळी ६४१.६८ मीटर आहे. एकूण साठा १२५.९१ दलघमी व उपयुक्त साठा ९८.६२ दलघमी आहे. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका होता.

टॅग्स :Waterपाणी