शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चासकमानमधून रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:46 IST

५५० क्युसेकने विसर्ग सुरू; पिकांना होणार फायदा

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात ४५.९७ टक्के म्हणजेच केवळ ४.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून शुक्रवारी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून ५५० क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल ५७ दिवसांनंतर म्हणजेच २८ डिसेंबरला शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ४४.१२ टक्के म्हणजे ४.३० टीएमसी व उपयुक्त साठा व ३.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मागील वर्षी याच तारखेला ७.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलैला सोडण्यात आाले होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार ते सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. परंतु शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणीटंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याने २८ डिसेंबरला शुक्रवारी सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले होते.धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लकचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे तिसरे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे रब्बी आवर्तनाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, मिरची, बाजरी, ज्वारी आदींसह तरकारी पिकांना फायदा होऊन पिकांचे उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात पिकांना फायदा होणार आहे. सध्या धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पाणीपातळी ६४१.६८ मीटर आहे. एकूण साठा १२५.९१ दलघमी व उपयुक्त साठा ९८.६२ दलघमी आहे. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका होता.

टॅग्स :Waterपाणी