शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

‘तोरणा’वर जाताय सावधान ! धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:57 IST

तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अतिदुर्गम तोरणा किल्ल्यावर तळ्यात बुडून एका युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘लोकमत’ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक धोकादायक ठिकाणे असल्याचे समोर आले आहे.

हरिप्रसाद सवणेवेल्हे : तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अतिदुर्गम तोरणा किल्ल्यावर तळ्यात बुडून एका युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘लोकमत’ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक धोकादायक ठिकाणे असल्याचे समोर आले आहे. येथे सूचनाफलकही लावण्याचे कष्ट पुरातत्त्व विभागाने घेतले नाही. त्यामुळे पर्यटकांनो, किल्ल्यावर जाताय सावधान!पावसाळ्यात वर्षासहली आणि भिजण्याचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच, ट्रेकर्स ग्रुपही येथे येत आहेत. मात्र, येथील पर्यटकांवर नियंत्रण ठेवणारी सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवघड ठिकाणी धोक्याच्या सूचना, संवेदनशील ठिकाणी जाण्यास निर्बंध आणि गडसुरक्षा यांचा अभाव असल्याने तोरणा किल्ला मृत्यूचा सापळा बनत आहे.शिवाय, तोरणा किल्ल्याचे बांधकामही अतिशय जुनाट व धोकादायक बनले आहे. किल्ल्यावरील अनेक धोकादायक ठिकाणे सूचनांअभावी व माहितीअभावी पर्यटकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. अशा अनोळखी ठिकाणी खबरदारीचे सूचनाफलक व सुरक्षा यंत्रणा नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. किल्ल्यावरील अशा धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावावेत आणि किल्ल्यावरील व चढाई मार्गावरील जीवघेण्या ठिकाणी पुरातत्त्व विभागाने लक्ष घालून संरक्षणात्मक रचना उभी करावी, अशी मागणी वेल्हे येथील मावळा जवान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.असा आहे तोरणागड..तोरणा किल्ल्याला शिवकालीन इतिहासापूर्वी प्रचंडगड असे नाव होते. या किल्ल्याची व्याप्ती अतिप्रचंड आहे. सह्याद्रीच्या अत्युच्य किल्ल्यात सर्वांत उंच किल्ला म्हणून तोरणागडाची गणना होते. किल्ल्याभोवती घनदाट अरण्य असून, आजही अनेक ठिकाणी मनुष्यास जाणे शक्य नाही. उंच आणि ताशीव कडे, धोकादायक वाटा यामुळे गडवाट अतिशय कठीण आहे. परिसरात जंगली श्वापदांचा वावर आणि गडाच्या बाजूने सर्वत्र उंच डोंगररांगा पसरल्याने हा परिसर म्हणजे डेंजर झोन आहे. या परिसरात डोंगरांमुळे व जंगलामुळेएकदा रस्ता चुकला, की परत सापडणे कठीण आहे.यंत्रणेअभावी मृत्यूला निमंत्रण...११ व्या शतकात बहामनी राजवटीत बांधलेले बुरुज ढासळत आहेत. अशा ठिकाणी सूचनाफलक लावणे किंवा तेथे जाण्यास निर्बंध घालणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी पर्यटक राजरोसपणे जाऊन बसत आहेत. शिवाय, येथे ४ ते ५ तलाव असून पावसाळ्यात हे तलाव काठोकाठ भरतात. नवीन पर्यटक उत्साहात पाण्यात उतरतात येथेही धोक्याच्या सूचना दिल्यास अनर्थ टळू शकतो. गडावर अनेक धोकादायक वाटा असून, पर्यटकांना योग्य रस्ते सापडत नाहीत. परिणामी चुकीच्या दिशेने भरकटून जाऊन कड्यावरून कोसळून जीव जाण्याच्या घटना येथे घडत आहेत.तर त्याचा जीव वाचला असता......गणेशस्थापनेदिवशी किल्ल्यावर आलेल्या एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्या तरुणाला गडावरील तलावात पाणी कमी आहे, असे वाटल्याने तो तलावात उतरला. मात्र, पाय घसरून तो सरळ आत बुडाला. धुक्यामुळे व पावसामुळे त्याच्या मित्रांना तो बुडाल्याचे समजलेच नाही. वास्तविक या तलावाच्या ठिकाणी धोक्याची सूचना असती, तर खबरदारी घेऊन त्याचे प्राण वाचले असते. मात्र, अशा धोक्याच्या सूचना नसल्याने माहिती नसलेले नवखे पर्यटक धोका पत्करून जिवाशी खेळ खेळतात.गडावरील काही दुर्घटनाउत्तर प्रदेश येथील दोन युवकांचा तोरणा किल्ल्यावरील कड्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला होता. मृतदेह शोधण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. ५ दिवसांनी मृतदेह सापडले.१९ फेब्रुवारी २०१६ : सातारा येथील युवकाचा किल्ल्यावर चढताना दरीत कोसळून मृत्यूजून २०१७ : पुण्यातील तरुण कापसे हा युवक पाय घसरून कड्यावरून कोसळला; गंभीर जखमी.२५ आॅगस्ट २०१७ : पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमधील यशवंत गोल्लापुडी याचा गडावरील तलावात बुडून मृत्यू.