शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

लग्नपत्रिकेतून अंकुरणार तुळस ; बघा वृक्षसंवर्धनाचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:14 IST

प्रत्यक्ष या पत्रिका तयार करणाऱ्या एका कुटुंबाने मात्र मुलाच्या लग्नपत्रिकेत चक्क तुळशीचे बी मिसळले आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर पत्रिका टाकून देण्याऐवजी त्या मातीत पुरल्या तर रोपे येतील आणि ती कायमस्वरूपी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात ताजेपणा आणतील अशी त्यांची भावना आहे. 

पुणे :कोणताही कार्यक्रम म्हटला की पत्रिका छापणे आलेच. भारतात तर बारशाच्या लग्नपत्रिकांपासून ते वर्षश्राद्ध आणि इतरही सर्व कार्यक्रमांच्या पत्रिका आवर्जून छापल्या जातात. इतकेच नव्हे तर हल्ली आर्थिक सुबत्ता दाखवण्यासाठीसुद्धा महागड्या लग्नपत्रिकेचा माध्यम म्हणून वापर केला जातो. पण प्रत्यक्ष या पत्रिका तयार करणाऱ्या एका कुटुंबाने मात्र मुलाच्या लग्नपत्रिकेत चक्क तुळशीचे बी मिसळले आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर पत्रिका टाकून देण्याऐवजी त्या मातीत पुरल्या तर रोपे येतील आणि ती कायमस्वरूपी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात ताजेपणा आणतील अशी त्यांची भावना आहे. 

हा उपक्रम राबवला आहे पुण्यातील कव्हर कुटुंबाने. हे कुटुंब खरे तर मूळचे विदर्भातले आहे.त्यामुळे कमी वृक्ष संख्या आणि उन्हाच्या झळा त्यांनी जन्मजात अनुभवल्या आहेत. पुढे डीटीपी'च्या व्यवसायात त्यांनी हजारो पत्रिका बनवल्या पण 'झाडे जगवा, झाडे वाचवा' या पलीकडे त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा होती. त्याच विचारातून त्यांनी बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या इको-फ्रेंडली कागदाचा वापर केला आहे. या पत्रिका बनवणारे दिनेश म्हणतात, 'जगाचे वाढते तापमान बघता झाडांची आजही प्रचंड गरज आहे.त्यामुळे खूप विचार करून आम्ही हा उपक्रम राबवला. पत्रिका पुरल्यावर तयार होणारी रोपे प्रत्येकाला प्राणवायू देतील आणि आमचा उद्देश सफल होईल'. नवरदेव निलेश म्हणाले की,' मी अनेकदा वृक्षसंवर्धनाचे संदेश लिहिले आहेत. मात्र यावेळी मला प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. कार्यक्रम झाल्यावर पत्रिका फेकून न देता झाडांच्या रूपाने त्याच्या स्मृती कायमस्वरूपी टिकू शकतात'.ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी ती शेअरही केल्याची बघायला मिळत आहे'. 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल