शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 02:52 IST

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

पाईट : अंबोली (ता. खेड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अंबोली (ता. खेड) येथे १९९२ मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी स्थिती पाहता भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. सुरुवातीच्या ५ ते ६ वर्षांत यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. यामुळे परिसरातील अंबोली, विन्हाम, खरवली, कोहिंडे या चार गावांचा बारमाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली होती. बंधाºयामध्ये साठवणूक होत असलेल्या पाण्याने १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येण्यास मदत झाली होती.सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती उद्भवली असताना पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. याचा या चार गावांना चांगलाच फटका बसणार आहे.याबाबत ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या बाबत येथील सरपंच लक्ष्मण शिंदे म्हणाले, आम्ही या बाबत अनेक पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केला आहे. अंबोली आणि परिसरातील गावांना कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासठी हा बंधारा एकमेव साधन आहे. परंतु पाटबंधारे विभाग त्याकडे कानाडोळ करत आहे.चासकमान पाटबंधारे विभागाअंतर्गत भामा आसखेड सिंचन विभाग करंजविहिरे यांच्या आखत्यारित हा बंधारा येतो. मात्र, गेल्या १० वर्षांपासून बंधाºयातून पाण्याची गळती होत असल्याने बंधाºयात पाणी साचत नाही. या सोबतच बंधाºयाचे ढापेही कुजले आहेत. या वर्षी ढापेही बसविण्यात आले नाही. यामुळे बंधाºयामध्ये पाणी साचले नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे