शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीही झाली असती ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: September 1, 2015 03:59 IST

सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांची स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची क्षमता असूनही राज्यातील नव्हे, तर देशातील ‘पॉवरबाज’ सत्ताकेंद्र समजले जाणारे

सुनील राऊत, बारामतीसुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांची स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची क्षमता असूनही राज्यातील नव्हे, तर देशातील ‘पॉवरबाज’ सत्ताकेंद्र समजले जाणारे बारामती राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट होऊ शकली नाही. रस्ते, रेल्वे, तसेच हवाई मार्गाची सुविधा, वेगाने विकसित होणारे औद्योगिकीकरण यामुळे शहरातील नागरीकरणाचा वेग वाढत आहे. मात्र, असे असताना, या स्पर्धेत बारामतीची वर्णी लागली नसल्याचे दिसून येते. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने केंद्र शासनाची जेएनएनयूआरएम योजना बंद केल्यानंतर, मोठ्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी योजना घोषित केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने जुलै महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत राज्यातील १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या २६ महापालिका, तसेच १९ ‘अ’ दर्जाच्या नगर परिषदांची अशी ४६ शहरांची निवड केली होती. राज्य शासनाने ज्या शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड केली, त्या शहरांसाठी एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा म्हणून उभे करू शकणारे शहर हे दोन निकष ठेवले होते. प्रत्यक्षात बारामती शहराची लोकसंख्या ही १ लाखापेक्षा जास्त आहे. तसेच २०१५-१६ चे अंदाजपत्रक जवळपास २९१ कोटी रुपयांचे आहे. त्यात सुमारे २१७ कोटी रुपयांची भांडवली, तर ७४ कोटींचा महसुली खर्च आहे. त्यामुळे बारामती शहर या स्पर्धेत सहजरीत्या उतरू शकले असते. मात्र, शासनाकडून केवळ ‘अ’ दर्जा असलेल्या नगर परिषदांचाच यात समावेश करण्यात आल्याने बारामती शहर शासनाच्या निवडप्रक्रियेतून बाहेर पडले.पुणे महापालिकेच्या एका कार्यक्रमात दीड वर्षापूर्वी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठी शहरे किती वाढावित याला मर्यादा असाव्यात, असे सूचक वक्तव्य केले होते. मोठ्या शहरांची वाढ थांबवायची असतील, तर लहान शहरे विकसित करून त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने, रस्ते, विमान वाहतूक, तसेच रेल्वेद्वारे मालवाहतूक या सर्व प्रकारच्या दळणवळणासाठी बारामती हे शहर विकासासाठी योग्य शहर आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या अशा योजनांच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मिळाल्यास शहराच्या विकासाचे चित्र आणखी बदलणार आहे. केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात देशातील १०० शहरे पुढील ५ वर्षांत विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे निदान आत्ता हुकलेली संधी पुढील पाच वर्षांत मिळाल्यास ते शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बारामती नगर परिषदेस ‘अ’ दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठविला. त्या वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार हेच राज्याचे उपमुख्यमंत्री होते. या प्रस्तावास दीड वर्ष लोटले तरी मान्यता मिळालेली नाही. त्याच वर्षी निर्णय घेतला असता, तर आजचे चित्र वेगळे असते.बारामती शहराचा गेल्या दशकभरातील वाढते नागरीकरण आणि विस्तार पाहून राज्य शासनाने आॅक्टोबर २०१२मध्ये शहराची हद्दवाढ केली. त्या वेळी शहराचा विस्तार ४.७० चौरस किलोमीटर तर लोकसंख्या ५० हजार होती. हद्दवाढीनंतर विस्तार दहा पटीने म्हणजेच ५५ चौरस किलोमीटर तर लोकसंख्या १ लाख २० हजारांच्या घरात पोहोचली. त्यामुळे नगरपालिकेकडून मार्च २०१४ मध्ये ‘अ ’ दर्जाचे निकष पूर्ण होत होते.