शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

बारामतीत बोलायला कंठ फुटतो, गिरीष बापटांचा अजित पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:09 IST

पालकमंत्री गिरीश बापट : लोकांनी अण्णांचा आदर ठेवावा

सांगवी : ‘माझी तब्येत बरी नाही. म्हणजे पुण्यात असल्यास माझा घसा बसतो. मात्र, बारामतीत आल्यावर बोलायला माझा कंठ फुटतो. बारामतीतल्या काही लोकांनी अण्णांचा आदर ठेवावा,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला. तर, सांगवीच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ५१ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांना भारतीय साखर कारखानदारीतील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेकडून सहकार महर्षी पुरस्काराने गौरवल्याबद्दल सांगवी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री बापट, विविध संस्थांच्या वतीने सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला, त्या वेळी बापट बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘काही लोक भाजपा शेतकरीविरोधी असल्याचे सांगतात. परंतु, भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी धोरण आखत आहे. राज्यात आणि देशात सरकार तळागाळातील लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करीत असून जनताही योग्य दाद देईल. सांगली, जळगावच्या निवडणुकीत ते दाखवून दिले.’’

या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साखर संघ, अध्यक्ष माळेगाव साखर कारखाना रंजन तावरे, माजी अध्यक्ष सोमेश्वर साखर कारखाना शहाजी काकडे, प्रदेश सरचिटणिस किसान मोर्चा भाजपा वासुदेव काळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिलीप खैरे, राहुल तावरे पाटील, सरपंच वर्षा तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले व ग्रामस्थ उपस्थित होते.गुरूची विद्या गुरूलाच...४विरोधी पक्षात असताना हर्षवर्धन पाटलांविषयी बापट यांनी गमतीजमती सांगत संसदीय मंत्र्यांकडे संसदीयव्यतिरिक्तही एक अदृश्य खाते असते त्याला फोडाफोडीचे खात म्हटले जाते आणि फोडाफोडी कशी करायची, हे तुमच्याकडून शिकलो. त्यामुळे गुरूचीविद्या गुरुलाच मिळणार, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना राजकीय शुभेच्छा देत विरोधात असाल तरी प्रेम वाटले पाहिजे....बारामतीलाअदृश्य कॅनाॉलद्वारे पाणी मिळते1बारामतीमधून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिळविणे म्हणजे सोपे नाही. चंद्रराव तावरे यांनी पालकमंत्र्यांना बंद पाईपने पाणी सोडण्याची मागणी केली. या वेळी पालकमंत्री म्हणाले, की धरणातून येणार पिण्याचे पाणी बंद पाईपद्वारेच यावे, याला माझा पाठिंबा आहे. तर, धरणातून निघालेले पाणी बारामती व्हाया इंदापूरला कसे पोहोचेल, हीपण काळजी घेतली पाहिजे, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.2यावर बापट म्हणाले, की बंद पाईपने पाणी मिळणे गरजेचे आहे. याने शेतकºयांना फायदा होईल. पुण्यातून बारामती, दौंड, इंदापूरला पाणी मिळते; परंतु बारामतीला एक अदृश्य कॅनॉल आहे. त्यातून बारामतीला पाणी मिळतेच मिळते. त्यांनी काय करून ठेवलंय काय माहीत? असा टोला पालकमंत्र्यांनी लगावला.

टॅग्स :Baramatiबारामतीgirish bapatगिरीष बापटPuneपुणे