शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बारामतीत उभी राहतेय बहुमजली भाजीमंडई

By admin | Updated: October 8, 2015 05:34 IST

शहरात बहुमजली भाजीमंडई व व्यापार संकुल उभे राहत आहे. बारामती शहराची पाच पट हद्दवाढ झाली आहे. याचअनुषंगाने जुनी गणेश भाजीमंडई पाडून त्या ठिकाणी

बारामती : शहरात बहुमजली भाजीमंडई व व्यापार संकुल उभे राहत आहे. बारामती शहराची पाच पट हद्दवाढ झाली आहे. याचअनुषंगाने जुनी गणेश भाजीमंडई पाडून त्या ठिकाणी तब्बल २२ कोटी ४० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा असलेली मंडई आकाराला येत आहे. या इमारतीत वाहनतळाचीदेखील सोय होणार असल्याने वाहने लावण्यासाठी होत असलेला मोठा प्रश्न सुटणार आहे.जुन्या हद्दीत दोन भाजीमंडया होत्या. त्यांपैकी जुन्या भाजीमंडईच्या जागेवर नगरपालिकेने व्यापार संकुल उभारले. तर, श्रीगणेश भाजीमंडईत व्यापारी गाळ्यांसह भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी ओटे बांधण्यात आले होते. लोकसंख्यावाढीमुळे या भाजीमंडईची जागा अपुरी पडू लागली. गुरुवारी आठवडेबाजाराला शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत होते. त्याचअनुषंगाने तालुकास्तरीय हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या बहुमजली भाजीमंडईचा आराखडा जयंत किकले यांनी तयार केला.जवळपास ८०० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. त्यामध्ये २०० चारचाकी वाहने, ६०० दुचाकी वाहने बसतील. ५८ व्यापारी गाळे काढण्यात येणार आहे. तर भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी २६२ ओटे बांधण्यात येणार आहेत. या इमारतीसाठी १४ कोटी ३५ लाख राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. ३ कोटी ५८ लाख नगरपालिकेच्या निधीतून खर्च होणार आहेत. तर, ५ कोटी रुपये आमदार अजित पवार यांच्या प्राथमिक सुविधा अनुदान योजनेतून उपलब्ध होणार आहेत. राज्य शासनाने ७ कोटी १७ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. त्यातील २ कोटी ७२ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. या मंडईलगतच असलेल्या जागेतदेखील ४५ गाळ्यांचे व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासह अन्य सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. शहरात ९ भाजीमंडया सुरू करणारशहरात ९ ठिकाणी भाजीमंडई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी दिली. जळोची भागात दीड एकरांत भाजी मंडई उभारली जाणार आहे. कसबा, सूर्यनगरी, खंडोबानगर, तांदूळवाडी या ठिकाणीदेखील भाजीमंडई सुरू होणार आहे. जळोची, मार्केट यार्ड येथे भाजी मंडई तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात भाजीखरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मंडईची सोय झाल्यामुळे मोठा प्रश्न सुटणार आहे.