शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत उभी राहतेय बहुमजली भाजीमंडई

By admin | Updated: October 8, 2015 05:34 IST

शहरात बहुमजली भाजीमंडई व व्यापार संकुल उभे राहत आहे. बारामती शहराची पाच पट हद्दवाढ झाली आहे. याचअनुषंगाने जुनी गणेश भाजीमंडई पाडून त्या ठिकाणी

बारामती : शहरात बहुमजली भाजीमंडई व व्यापार संकुल उभे राहत आहे. बारामती शहराची पाच पट हद्दवाढ झाली आहे. याचअनुषंगाने जुनी गणेश भाजीमंडई पाडून त्या ठिकाणी तब्बल २२ कोटी ४० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा असलेली मंडई आकाराला येत आहे. या इमारतीत वाहनतळाचीदेखील सोय होणार असल्याने वाहने लावण्यासाठी होत असलेला मोठा प्रश्न सुटणार आहे.जुन्या हद्दीत दोन भाजीमंडया होत्या. त्यांपैकी जुन्या भाजीमंडईच्या जागेवर नगरपालिकेने व्यापार संकुल उभारले. तर, श्रीगणेश भाजीमंडईत व्यापारी गाळ्यांसह भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी ओटे बांधण्यात आले होते. लोकसंख्यावाढीमुळे या भाजीमंडईची जागा अपुरी पडू लागली. गुरुवारी आठवडेबाजाराला शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत होते. त्याचअनुषंगाने तालुकास्तरीय हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या बहुमजली भाजीमंडईचा आराखडा जयंत किकले यांनी तयार केला.जवळपास ८०० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. त्यामध्ये २०० चारचाकी वाहने, ६०० दुचाकी वाहने बसतील. ५८ व्यापारी गाळे काढण्यात येणार आहे. तर भाजीपाला, फळभाज्या विक्रीसाठी २६२ ओटे बांधण्यात येणार आहेत. या इमारतीसाठी १४ कोटी ३५ लाख राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. ३ कोटी ५८ लाख नगरपालिकेच्या निधीतून खर्च होणार आहेत. तर, ५ कोटी रुपये आमदार अजित पवार यांच्या प्राथमिक सुविधा अनुदान योजनेतून उपलब्ध होणार आहेत. राज्य शासनाने ७ कोटी १७ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. त्यातील २ कोटी ७२ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. या मंडईलगतच असलेल्या जागेतदेखील ४५ गाळ्यांचे व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासह अन्य सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. शहरात ९ भाजीमंडया सुरू करणारशहरात ९ ठिकाणी भाजीमंडई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी दिली. जळोची भागात दीड एकरांत भाजी मंडई उभारली जाणार आहे. कसबा, सूर्यनगरी, खंडोबानगर, तांदूळवाडी या ठिकाणीदेखील भाजीमंडई सुरू होणार आहे. जळोची, मार्केट यार्ड येथे भाजी मंडई तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात भाजीखरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मंडईची सोय झाल्यामुळे मोठा प्रश्न सुटणार आहे.