शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे.

बारामती : शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तब्बल ८ ते ९ महिन्यांनी जाग आली आहे. आता त्यासाठी तलावातील पाण्याचा उपसा केला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली. रविवारपासून नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे या कृत्रिम पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जावे लागले आहे. साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी मातीचे साठवण तलाव होते. त्यानंतर सिमेंट-काँक्रीटचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२८ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या तलावात आहे. या तलावात पाणी साठविल्यानंतर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साधारणत: मे २०१४ पासून गळतीचे प्रमाण वाढले. दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी साठवण तलावातून गळतीच्या रूपाने बाहेर पडत होते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे भाग पडू नये, यासाठी नगरपालिकेने ४ पंप लावून ज्या बाजूने पाणी साठवण तलावातून बाहेर पडत आहे. ते उचलून परत तलावात सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील पाणीटंचाई समस्या दूर झाली. यावर कायम स्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तलावातील साठवलेले पाणी अक्षरश: गटाराद्वारे सोडून देण्यात आले. हे पाणी साठवून ठेवण्याचीदेखील तसदी घेतली नाही. गळती शोधण्यासाठी प्राधिकरणाने तलाव रिकामा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाव रिकामा करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फक्त पाहणी करून जात होते. हा तलाव रिकामा केल्यामुळे रविवारपासून पाणीटंचाईचा सामना बारामतीकरांना करावा लागला. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सुदैवाने सोमवारी साखर कारखान्यांसाठी आवर्तन देण्यात आले होते. ते पाणी पुन्हा जुन्या खोदलेल्या साठवण तलावात साठवण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे संकट टळले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तलाव रिकामा करून दिला आहे. साधारणत: फेब्रुवारी महिनाअखेर काम पूर्ण होईल, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जुना माती बंधाऱ्याच्या सिमेंट-क्राँक्रिटीकरणाचे काम थांबवून त्यामध्ये पाणी साठविण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हे काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारे या कामासाठी खर्च करण्यात येणार नाही. - सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष