शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे.

बारामती : शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तब्बल ८ ते ९ महिन्यांनी जाग आली आहे. आता त्यासाठी तलावातील पाण्याचा उपसा केला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली. रविवारपासून नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे या कृत्रिम पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जावे लागले आहे. साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी मातीचे साठवण तलाव होते. त्यानंतर सिमेंट-काँक्रीटचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२८ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या तलावात आहे. या तलावात पाणी साठविल्यानंतर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साधारणत: मे २०१४ पासून गळतीचे प्रमाण वाढले. दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी साठवण तलावातून गळतीच्या रूपाने बाहेर पडत होते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे भाग पडू नये, यासाठी नगरपालिकेने ४ पंप लावून ज्या बाजूने पाणी साठवण तलावातून बाहेर पडत आहे. ते उचलून परत तलावात सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील पाणीटंचाई समस्या दूर झाली. यावर कायम स्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तलावातील साठवलेले पाणी अक्षरश: गटाराद्वारे सोडून देण्यात आले. हे पाणी साठवून ठेवण्याचीदेखील तसदी घेतली नाही. गळती शोधण्यासाठी प्राधिकरणाने तलाव रिकामा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाव रिकामा करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फक्त पाहणी करून जात होते. हा तलाव रिकामा केल्यामुळे रविवारपासून पाणीटंचाईचा सामना बारामतीकरांना करावा लागला. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सुदैवाने सोमवारी साखर कारखान्यांसाठी आवर्तन देण्यात आले होते. ते पाणी पुन्हा जुन्या खोदलेल्या साठवण तलावात साठवण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे संकट टळले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तलाव रिकामा करून दिला आहे. साधारणत: फेब्रुवारी महिनाअखेर काम पूर्ण होईल, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जुना माती बंधाऱ्याच्या सिमेंट-क्राँक्रिटीकरणाचे काम थांबवून त्यामध्ये पाणी साठविण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हे काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारे या कामासाठी खर्च करण्यात येणार नाही. - सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष