शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे.

बारामती : शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तब्बल ८ ते ९ महिन्यांनी जाग आली आहे. आता त्यासाठी तलावातील पाण्याचा उपसा केला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली. रविवारपासून नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे या कृत्रिम पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जावे लागले आहे. साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी मातीचे साठवण तलाव होते. त्यानंतर सिमेंट-काँक्रीटचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२८ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या तलावात आहे. या तलावात पाणी साठविल्यानंतर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साधारणत: मे २०१४ पासून गळतीचे प्रमाण वाढले. दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी साठवण तलावातून गळतीच्या रूपाने बाहेर पडत होते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे भाग पडू नये, यासाठी नगरपालिकेने ४ पंप लावून ज्या बाजूने पाणी साठवण तलावातून बाहेर पडत आहे. ते उचलून परत तलावात सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील पाणीटंचाई समस्या दूर झाली. यावर कायम स्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तलावातील साठवलेले पाणी अक्षरश: गटाराद्वारे सोडून देण्यात आले. हे पाणी साठवून ठेवण्याचीदेखील तसदी घेतली नाही. गळती शोधण्यासाठी प्राधिकरणाने तलाव रिकामा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाव रिकामा करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फक्त पाहणी करून जात होते. हा तलाव रिकामा केल्यामुळे रविवारपासून पाणीटंचाईचा सामना बारामतीकरांना करावा लागला. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सुदैवाने सोमवारी साखर कारखान्यांसाठी आवर्तन देण्यात आले होते. ते पाणी पुन्हा जुन्या खोदलेल्या साठवण तलावात साठवण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे संकट टळले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तलाव रिकामा करून दिला आहे. साधारणत: फेब्रुवारी महिनाअखेर काम पूर्ण होईल, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जुना माती बंधाऱ्याच्या सिमेंट-क्राँक्रिटीकरणाचे काम थांबवून त्यामध्ये पाणी साठविण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हे काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारे या कामासाठी खर्च करण्यात येणार नाही. - सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष