शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 18:53 IST

देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देबहुजनांनी निवडून दिलेले असल्याने पाच वर्षे त्यांची सेवा करणारविधानसभा लढविण्यास मी सज्ज 

रावेत : भाजपच्या चिन्हावर प्रथमच प्रभाग१६ मधून निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. भाजपमध्ये अस्वस्थ व असुरक्षित वाटत असल्याने पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा राजीनामा देणार असलो तरी नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जर वेळ आली तर तोही देऊ असेही ते म्हणाले. राजकीय वाटचालीत सत्ताधारी भाजपपासून अलिप्त राहण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात दलितांवरील अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत. देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारण व धोरणामुळे अस्वस्थ असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविताना म्हणाले,मोठ्या विश्वासाने भाजपमध्ये आलो होतो पण विश्वासघात झाला.पक्ष सोडण्यामागील भूमिका स्पष्ट करताना ओव्हाळ म्हणाले, अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा काही अंशी गैरवापर होत आहे, हे मान्य आहे. पण त्याचा अर्थ त्यात बदलच करणे उचित नाही. ते त्यावरचे औषध नाही. त्यासाठी दुसरा कायदा हवा तर आणावा. बहुजनांनी निवडून दिलेले असल्याने पाच वर्षे त्यांची सेवा करणार आहे. मात्र पक्षातून बाहेर पडल्यानंतर ही सेवा करताना अडचण आली, नगरसेवकपदाचाही त्याग करू असे ते म्हणाले. काही मंडळी दलित कार्डाचा वापर करून एकसंघ होण्यामध्ये अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगत आठवलेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दलित समाजाच्या लोकांच्या पदोन्नत्या शासनामध्ये रखडल्या आहेत. भाजपची विचारसरणी व धोरणाच्या आपण विरोधात आहोत. पक्षातील कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या विरोधात नाही. माझ्या निर्णयावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी. यावेळी आरपीआय चे शहराध्यक्ष सुधाकर बारभुवन,सरचिटणीस बाबा सरोदे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकते, कोषाध्यक्ष गौतम गायकवाड,सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.

विधानसभा लढविण्यास मी सज्ज २०१९ मध्ये येऊ घातलेली विधानसभा निवडणूक पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत. त्याची पूर्णपणे माझी तयारी झाली असून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून लढणार नाही.तर ती भाजपच्या विरोधात लढणार आहे. सर्वसमावेश विचारणीसरणीच्या राजकीय पक्षासोबत किंवा वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही बाळासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा