शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:41 IST

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे

बारामती: अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच, पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकणार आहे. १ ऑक्टोबर, २०२१ पासून खराब खाद्यपदार्थ देणाऱ्या हॉटेल, केटरर्स, स्वीट होम्स, बेकरी यांची तात्काळ तक्रार दाखल करण्याचे अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी माहिती दिली. त्यानुसार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (fssai) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी १ ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केला आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Food Safety and Standards Authority of India) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे. याबाबत ‘एफएसएसएआय ’ने एक आदेश जारी केला आहे. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत, इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक ‘एफएसएसएआय’ नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘एफएसएसएआय’ किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा ‘एफएसएसएआय’क्रमांक ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसल्यास, त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.

दरम्यान, खाद्यपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्या नियमांच्या प्रचारासाठी निर्देश जनजागृती आणि प्रबोधन करण्याचंही नियोजन केल आहे. यासाठी त्यांनी परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांना नव्या नियमांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम २ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होतील. पॅकेजिंग केलेल्या अन्नपदार्थांवर ‘एफएसएसएआय नंबर छापणं बंधनकारक करण्यात आल आहे. यात रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, केटरर्स आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. यांनाही आपल्या खाद्य पदार्थांवर हा नंबर नमूद करावा लागणार आहे.

... ‘एफएसएसएआय’ नंबरचं ग्राहकांसाठी महत्त्व-  ‘एफएसएसएआय’ क्रमांक हा कोणत्याही खाद्यपदार्थ उत्पादकाचा खास १४ अंकी क्रमांक असतो. ‘एफएसएसएआय’ क्रमांक संबंधित उत्पादकाच्या खाद्यपदार्थ पॅकिंगवर नमूद असल्यास त्यांच्या विरोधात सहज तक्रार करता येते. मात्र, जर तो क्रमांक नसल्यास संबंधित पदार्थ कुणाचे आहेत, याची ओळख पटवणं कठीण होतं. म्हणूनच फूड बिजनेस ऑपरेटरची तक्रार करण्यासाठी हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यातून दोषींवर तात्काळ कारवाई करता येणार असल्याचे अ‍ॅड झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfood poisoningअन्नातून विषबाधाhotelहॉटेल