शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:41 IST

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे

बारामती: अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच, पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकणार आहे. १ ऑक्टोबर, २०२१ पासून खराब खाद्यपदार्थ देणाऱ्या हॉटेल, केटरर्स, स्वीट होम्स, बेकरी यांची तात्काळ तक्रार दाखल करण्याचे अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी माहिती दिली. त्यानुसार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (fssai) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी १ ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केला आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Food Safety and Standards Authority of India) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे. याबाबत ‘एफएसएसएआय ’ने एक आदेश जारी केला आहे. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत, इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक ‘एफएसएसएआय’ नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘एफएसएसएआय’ किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा ‘एफएसएसएआय’क्रमांक ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसल्यास, त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.

दरम्यान, खाद्यपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्या नियमांच्या प्रचारासाठी निर्देश जनजागृती आणि प्रबोधन करण्याचंही नियोजन केल आहे. यासाठी त्यांनी परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांना नव्या नियमांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम २ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होतील. पॅकेजिंग केलेल्या अन्नपदार्थांवर ‘एफएसएसएआय नंबर छापणं बंधनकारक करण्यात आल आहे. यात रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, केटरर्स आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. यांनाही आपल्या खाद्य पदार्थांवर हा नंबर नमूद करावा लागणार आहे.

... ‘एफएसएसएआय’ नंबरचं ग्राहकांसाठी महत्त्व-  ‘एफएसएसएआय’ क्रमांक हा कोणत्याही खाद्यपदार्थ उत्पादकाचा खास १४ अंकी क्रमांक असतो. ‘एफएसएसएआय’ क्रमांक संबंधित उत्पादकाच्या खाद्यपदार्थ पॅकिंगवर नमूद असल्यास त्यांच्या विरोधात सहज तक्रार करता येते. मात्र, जर तो क्रमांक नसल्यास संबंधित पदार्थ कुणाचे आहेत, याची ओळख पटवणं कठीण होतं. म्हणूनच फूड बिजनेस ऑपरेटरची तक्रार करण्यासाठी हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यातून दोषींवर तात्काळ कारवाई करता येणार असल्याचे अ‍ॅड झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfood poisoningअन्नातून विषबाधाhotelहॉटेल