शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

जिल्हा नियोजन निधी कपातीचा निर्णय मागे -सुधीर मुनगंटीवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:56 IST

शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा नियोजन समितीसाठी दिलेल्या एकूण निधीमध्ये ३० टक्के निधीची कपात करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला असून लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार पुण्यात जाहीर केले.

पुणे - शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा नियोजन समितीसाठी दिलेल्या एकूण निधीमध्ये ३० टक्के निधीची कपात करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला असून लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार पुण्यात जाहीर केले.राज्याच्या नियोजन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठक मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात विधान भवन येथे घेण्यात आली. या बैठकीस अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील,सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर,खासदार संजय काकडे, पुणे विभागीय आयुक्त चंद्र्रकांत दळवी यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमाफीसाठी निधीची आवश्यकता असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्या दिलेल्या विकास निधीमध्ये ३० टक्के कपात केली होती. त्याचप्रमाणे केंद्राच्या विविध योजनांसाठी जिल्हा प्रशासनाला काही टक्के निधी राखून ठेवावा लागत होता. त्यामुळे एकूण प्राप्त निधीपैकी केवळ ५० टक्के निधीच खर्चासाठी उपलब्ध होत होता.याबद्दल सर्वच जिल्हाधिकाºयांनी व उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ३० टक्के कपातीचा निर्णय मागे घेतला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्व जिल्ह्यांना त्यांना देण्यात आलेला १०० टक्के निधी वापरणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या योजनांसाठी राखून ठेवल्या जाणा-या निधीच्या टक्केवारीमध्ये सुद्धा कपात करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार