शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 20:06 IST

लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात....

ठळक मुद्देपेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये लिटरेटचर अँड फ्रीडम या विषयावर वाजपेयी यांचे व्याख्यान

पुणे :  मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे. त्यामुळे सत्य हेच आता अल्पसंख्यांक झालंय, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक वाजपेयी यांनी गुरूवारी व्यक्त केली.     पेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये लिटरेटचर अँड फ्रीडम या विषयावर वाजपेयी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते. पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे निमंत्रक डॉ. गणेश देवी आणि गीताली वि. म. या वेळी उपस्थित होत्या.     वाजपेयी म्हणाले, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळाले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वीच्या वसाहतवाद काळातही कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी स्वातंत्र्य घेतले होते. स्वातंत्र्य ही एक प्रकारची प्रेरणा आहे. आपल्याला हवे ते लिहिण्यासाठी लेखक स्वतंत्र असले पाहिजेत.  राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळते पण आत्मिक स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात. आध्यात्मिक आणि राजकीय व्यक्ती बेमालूमपणे खोटे हेच सत्य असल्याचे ठासून सांगतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे की आता सत्य हेच अल्पसंख्य झाले आहे. राजकारण आणि माध्यमांनी लोकांनी सारे काही विसरावे यासाठीच मोहीम राबवित आहेत. मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. आपण द्वितीय श्रेणीचे नागरिक असल्याची भावना मुस्लीमांमध्ये वाढताना दिसून येत आहे. हिंसक घटनांच्या वाढीमुळे सत्य बोलण्याचे धाडस दुर्मीळ झाले आहे. कलात्मक स्वातंत्र्य उपयोगात आणत लेखकांनी असहिष्णू समाजाविरोधात सत्य, स्वातंत्र्य आणि धैयासार्ठी जागर केला पाहिजे.      कुमार केतकर म्हणाले,  ज्या जमावाने गांधीजींचा खून केला तेच आज सत्तेवर आहेत. नथुरामच्या त्यागाचा गौरव केला जात आहे. गांधी आणि नेहरू यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृती जगविण्यासाठी सेवाग्राम येथील काँग्रेसच्या बैठकीला परवानगी नाकारली गेली. मात्र, ही बैठक काँग्रेस पक्षाची नव्हती. 'लिबर्टी'ची जागा 'प्रॉपर्टी'ने घेतली आहे.     

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस