शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 20:06 IST

लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात....

ठळक मुद्देपेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये लिटरेटचर अँड फ्रीडम या विषयावर वाजपेयी यांचे व्याख्यान

पुणे :  मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे. त्यामुळे सत्य हेच आता अल्पसंख्यांक झालंय, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक वाजपेयी यांनी गुरूवारी व्यक्त केली.     पेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये लिटरेटचर अँड फ्रीडम या विषयावर वाजपेयी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते. पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे निमंत्रक डॉ. गणेश देवी आणि गीताली वि. म. या वेळी उपस्थित होत्या.     वाजपेयी म्हणाले, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळाले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वीच्या वसाहतवाद काळातही कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी स्वातंत्र्य घेतले होते. स्वातंत्र्य ही एक प्रकारची प्रेरणा आहे. आपल्याला हवे ते लिहिण्यासाठी लेखक स्वतंत्र असले पाहिजेत.  राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळते पण आत्मिक स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात. आध्यात्मिक आणि राजकीय व्यक्ती बेमालूमपणे खोटे हेच सत्य असल्याचे ठासून सांगतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे की आता सत्य हेच अल्पसंख्य झाले आहे. राजकारण आणि माध्यमांनी लोकांनी सारे काही विसरावे यासाठीच मोहीम राबवित आहेत. मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. आपण द्वितीय श्रेणीचे नागरिक असल्याची भावना मुस्लीमांमध्ये वाढताना दिसून येत आहे. हिंसक घटनांच्या वाढीमुळे सत्य बोलण्याचे धाडस दुर्मीळ झाले आहे. कलात्मक स्वातंत्र्य उपयोगात आणत लेखकांनी असहिष्णू समाजाविरोधात सत्य, स्वातंत्र्य आणि धैयासार्ठी जागर केला पाहिजे.      कुमार केतकर म्हणाले,  ज्या जमावाने गांधीजींचा खून केला तेच आज सत्तेवर आहेत. नथुरामच्या त्यागाचा गौरव केला जात आहे. गांधी आणि नेहरू यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृती जगविण्यासाठी सेवाग्राम येथील काँग्रेसच्या बैठकीला परवानगी नाकारली गेली. मात्र, ही बैठक काँग्रेस पक्षाची नव्हती. 'लिबर्टी'ची जागा 'प्रॉपर्टी'ने घेतली आहे.     

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस