शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
4
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
5
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
6
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
7
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
8
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
9
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
10
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
11
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
12
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
13
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
14
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
15
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
16
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
17
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
18
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
19
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
20
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरच हल्ला!, गावठी दारूधंद्यावर कारवाईसाठी गेले होते पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:31 IST

गावठी दारूधंद्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावातील जमावाने जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले.

राजगुरुनगर : गावठी दारूधंद्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावातील जमावाने जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले. ही घटना खंड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि.१) सकाळी २३ पोलिसांचे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. पाच अड्डे उद्ध्वस्त केले. १३ जणांवर कारवाई करून पोलिसांच्या गाडीत बसविले. तसेच एका घरात पिंजºयात ठेवलेल्या शेकरू या प्राण्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, गावातील ग्रामस्थ महिलांनी ‘आमची माणसं घेऊन जाऊ नका’, असे सांगत पोलिसांची गाडी अडवली. अचानक जमाव आक्रमक झाला. हातात कोयते, गज, लाकडी दांडके, दगड घेऊन पोलिसांवर हल्ला केला. १५ मिनिटे पोलीस होमगार्ड व जमाव यांच्यामध्ये झटापट, मारहाण सुरू होती.यामध्ये पोलीस व होमगार्ड यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक आदित्य लोणीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून रक्तबंबाळ केले. त्यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहेत. होमगार्ड जयंवत कोहिनकर यांच्या डोक्यालाही १० टाके पडले. पोलीस कर्मचारी संदीप भापकर, राजेश नलावडे यांना जोरदार मारहाण केली. होमगार्ड महिला रूपाली शिंदे, संध्या शिंदे, अश्विनी सांडभोर व दोन महिला पोलिसांच्या डोक्याच्या केसांच्या झिंज्या ओढून फरफटत नेऊन मारहाण केली. पोलीस गाडीवर दगडफेक करून गाडीचे दार तोडून ती पेटविण्याचा प्रयत्न केला.याबाबत पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. ४ हजार ५०० रुपायांची गावठी दारू बनविण्याची रसायने, २ हजारांची तयार दारू, एक शेकरू प्राणी ताब्यात घेतले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, पोलीस निरिक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.गुंड प्रवत्तीचे लोक अवैध दारू बनवून विक्री करत असतील तर अशा लोकांना आम्ही अजिबात सोडणार नाही. आजचा झालेला प्रकार खूपच निंदनीय आहे. माझ्या पोलीस कर्मचाºयांनी जी कारवाई केली ती योग्य आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे अवैध गावठी दारू बनवून विक्री केली होती. त्यामध्ये अनेक लोकांना विषबाधा होऊन मृत्यू पावले होते. कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी अपुरे असल्यामुळे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांच्यावर कायदेशीर नियमानुसार कठोर कारवाई करणार आहे.- सुवेझ हक, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा