शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ऐन थंडीत निवडणुकीमुळे वातावरण गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटातील मोठ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कळंब ...

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटातील मोठ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार यावर पारा पारावर आणि चौका चौकात चर्चा रंगू लागल्याने ऐन थंडीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब आणि आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या वालचंदनगर ग्रामपंचायतींवर कोणाची वर्णी लागणार हा औत्सुक्याचा विषय झाला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र शासकीय जागेत अतिक्रमण प्रकरणामुळे कळंब गावाची सत्ता अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. तर वालचंदनगर ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. दोन्ही ग्रामपंचायतीचे मतदान इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याइतके असल्याने गावपातळीवर गट तट विसरून नव्या जोमाने कार्यकर्ते मंडळी कामाला लागली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत कमालीचा घोळ होता. मोठया प्रमाणावर हरकती घेतल्या होत्या आणि दुरुस्ती मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कागदपत्रे काढण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची धावपळ होताना दिसत आहे.

इंदापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रामपंचायती म्हणून उल्लेख असलेल्या ग्रामपंचायतीत कळंब आणि वालचंदनगर असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीवर तालुक्याचे लक्ष लागले आहे. कळंब ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागात १७ उमेदवार असून वालचंदनगर ग्रामपंचायतीत देखील ६ प्रभागातून १७ उमेदवारांची वर्णी लागणार आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकिय पटलांवरील महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या चाव्या कोणाच्या ताब्यात जाणार हे निवडणुकीनंतर कळणार असले तरी अनेक राजकीय अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आखाडे बांधले असले तरी मतदार राजा राजकारण्यांचे भवितव्य ठरवणार आहे हेच खरे.