शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नास्तिकांनी असे काय कोणाचे घोडे मारले? इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 05:53 IST

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती

१० एप्रिलला एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या नास्तिकांचा मेळाव्याला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. तोच मेळावा त्याच सभागृहात २४ एप्रिलला शांतपणे पार पडला. या दोन्ही घटनांची समाजमाध्यमांनी फारशी दखल घेतलेली दिसली नाही आणि तेही साहजिकच आहे. इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते. 

मेळाव्याला आलेल्या कोणाकडेही लाठ्या-काठ्या, शस्त्रे किंवा झेंडे नव्हते. कोणीही घोषणा देत आले नव्हते. कोणी गटागटाने किंवा झुंडीझुंडीने आले नव्हते. हे विवेकी लोक आपापली वाहने घेऊन किंवा रिक्षातून येत होते आणि शांतपणे सभागृहात जाऊन बसत होते. ते  जसे शांतपणे आले तसेच मेळावा संपल्यावर शांतपणे निघून गेले. कुठे गोंधळ नाही, गडबड नाही की घोषणा नाहीत. वक्त्यांनी लोकांना चिथावणी देणारी प्रक्षोभक भाषणे केली असेही काही घडले नाही. 

असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी उलगडून दाखवल्या. सोनावणे यांनी आदिमानवानंतर आलेल्या माणसाने देव कसा आणला आणि देव निर्गुण कसा आहे हे खुमासदार शैलीत सांगितले. सुनील सुकथनकर यांनी कला क्षेत्रातील अंधश्रद्धेची उदाहरणे दिली. थोर विचारवंत आणि विवेकवादी वालावलकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सबंध कार्यक्रमात स्वतःच्या बुद्धीचा वापर, विवेक आणि विचाराला चालना देणारी भाषणे झाली. रामनवमीच्या दिवशीही असाच मेळावा पार पडणार होता; पण विवेकी विचारांवर बंधने घालून आपणच श्रीरामांच्या सर्वसमावेशक धोरणालाच अनवधानाने विरोध करतोय हे विरोधकांच्या लक्षात आले नाही.

शरद बापट, पुणे