शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नास्तिकांनी असे काय कोणाचे घोडे मारले? इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 05:53 IST

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती

१० एप्रिलला एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या नास्तिकांचा मेळाव्याला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. तोच मेळावा त्याच सभागृहात २४ एप्रिलला शांतपणे पार पडला. या दोन्ही घटनांची समाजमाध्यमांनी फारशी दखल घेतलेली दिसली नाही आणि तेही साहजिकच आहे. इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते. 

मेळाव्याला आलेल्या कोणाकडेही लाठ्या-काठ्या, शस्त्रे किंवा झेंडे नव्हते. कोणीही घोषणा देत आले नव्हते. कोणी गटागटाने किंवा झुंडीझुंडीने आले नव्हते. हे विवेकी लोक आपापली वाहने घेऊन किंवा रिक्षातून येत होते आणि शांतपणे सभागृहात जाऊन बसत होते. ते  जसे शांतपणे आले तसेच मेळावा संपल्यावर शांतपणे निघून गेले. कुठे गोंधळ नाही, गडबड नाही की घोषणा नाहीत. वक्त्यांनी लोकांना चिथावणी देणारी प्रक्षोभक भाषणे केली असेही काही घडले नाही. 

असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी उलगडून दाखवल्या. सोनावणे यांनी आदिमानवानंतर आलेल्या माणसाने देव कसा आणला आणि देव निर्गुण कसा आहे हे खुमासदार शैलीत सांगितले. सुनील सुकथनकर यांनी कला क्षेत्रातील अंधश्रद्धेची उदाहरणे दिली. थोर विचारवंत आणि विवेकवादी वालावलकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सबंध कार्यक्रमात स्वतःच्या बुद्धीचा वापर, विवेक आणि विचाराला चालना देणारी भाषणे झाली. रामनवमीच्या दिवशीही असाच मेळावा पार पडणार होता; पण विवेकी विचारांवर बंधने घालून आपणच श्रीरामांच्या सर्वसमावेशक धोरणालाच अनवधानाने विरोध करतोय हे विरोधकांच्या लक्षात आले नाही.

शरद बापट, पुणे