शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 4:28 AM

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला.

पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला. दुस-या दिवसअखेर आसामने ३ बाद १०१ धावा करीत आपली आघाडी १२७ वर नेऊन ठेवली.पूना क्लबच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. आसामला तीनशेच्या आत रोखल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांप्रमाणेच आसामच्या गोलंदाजांनीही पोषक खेळपट्टीचा लाभ उचलत आपल्या संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सलामीवीर ऋतुराजचा (१२६ धावा, २१० चेंडू, १ षटकार, १४ चौकार) अपवाद वगळता इतर भरवशाच्या फलंदाजांनीनांगी टाकली.कालच्या ३ बाद ६४ वरून आज पुढे खेळणा-या महाराष्ट्राला पहिल्या सत्रात २ धक्के बसले. काल ७ धावांवर नाबाद असलेला रोहित मोटवानी १५ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीही ४ धावा करून तंबूत परतला. हे दोन्ही बळी पल्लवकुमार दास याने टिपले. ५ बाद ९३ अशा वाईट स्थितीतून ऋतुराज-प्रयाग भाटी या जोडीने महाराष्ट्राला बाहेर काढले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. भाटीने ५६ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या.भाटी बाद झाल्यावर ऋतुराजने श्रीकांत मुंढेसह (३० चेंडूंत ४ चौकारांसह २७) सातव्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला आघाडी मिळवून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. सत्यजित बच्छावने १४ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. मात्र, आसामच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत महाराष्ट्राचे पहिल्या डावात आघाडी घेण्याचे इरादे उधळून लावले. राहुल सिंग याने ऋतुराजला बाद करीत महाराष्ट्राच्या डावाला पूर्णविराम दिला. आसामतर्फे राहुल सिंगने सर्वाधिक ४, प्रीतम दास आणि पल्लवकुमार दास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया डावात आसामने आश्वासक प्रारंभ केल्यानंतर अखेरच्या सत्रात महाराष्ट्राच्या गोलंदाजांंनी ३ बळी मिळवत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने ३५ षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढेने १७ धावांत २, तर राहुल त्रिपाठीने ७ धावांत १ गडी बाद केला.सामन्याचे अद्याप २ दिवस शिल्लक आहेत. खेळपट्टीचा नूर पाहता या सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. आसामचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याची जबाबदारी गोलंदाजांनी पार पाडली आणि फलंदाज लौकिकाला जागले तर यजमान महाराष्ट्र हा सामनाजिंकू शकतो. दुसरीकडे दुसºया डावात चांगली फलंदाजी करून महाराष्ट्रासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवून गोलंदाजीच्या जोरावर बाजी मारण्याची संधी आसामला असेल.संक्षिप्त धावफलकआसाम : पहिला डाव : सर्व बाद २७९.महाराष्ट्र : पहिला डाव : ६८.२ षटकांत सर्व बाद २५३ (ऋतुराज गायकवाड १२६, प्रयाग भाटी ३१, सत्यजित बच्छाव १५, रोहित मोटवानी १५, चिराग खुराणा ८, अंकित बावणे ६, राहुल त्रिपाठी ४, निकित धुमाळ १, नौशाद शेख ०, प्रदीप दाढे नाबाद ०, राहुलसिंग ४/६३, प्रीतम दास २/६२, पल्लवकुमार दास २/६०, रजत खान १/२, अरूप दास १/५४).आसाम : दुसरा डाव : ३५ षटकांत ३ बाद १०१ (रिषव दास ३५, अभिषेक ठाकुराई ३५, पल्लवकुमार दास २६, प्रदीप दाढे २/१७, राहुल त्रिपाठी १/७).

टॅग्स :Cricketक्रिकेट