शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ashadhi Wari 2025 : पालखी मार्गावर मद्यविक्री व मांसविक्रीला बंदी; प्रशासनाचा कडक निर्णय

By किरण शिंदे | Updated: June 19, 2025 14:09 IST

संदीप गिल म्हणाले, वारीच्या मार्गक्रमणादरम्यान कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये आणि वारीची पारंपरिक भक्तीभावना कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे - आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांवर वारी काळात मद्यविक्री व मांसविक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली. 

संदीप गिल म्हणाले, वारीच्या मार्गक्रमणादरम्यान कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये आणि वारीची पारंपरिक भक्तीभावना कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस व संबंधित विभागांना या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असून, नियम भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

देहू व आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनांची व नागरिकांची सुरक्षितता, माहितीचा गोपनीय वापर, तसेच वारीदरम्यान होणाऱ्या गर्दीचा नियोजनबद्ध कारभार करण्यासाठी पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

१. ट्रॅफिक डायव्हर्जन (वाहतूक वळवण):पालखी मार्गांवर जड व अनावश्यक वाहनांची ये-जा थांबवण्यासाठी एकूण १२ ठिकाणी विशेष पोलिस अधिकारी व वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. हे उपाय वारीकर, नागरिक व इतर वाहनचालकांना अडथळा होऊ नये म्हणून करण्यात आले असून, सुगम वाहतूक सुनिश्चित केली जाणार आहे.

२. मद्यविक्री व मासविक्रीवर नियंत्रण:पालखी मार्गावरील हॉटेल्स व ढाब्यांवर मद्यविक्री व मासविक्री होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने विशेष निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दक्षतेसाठी कारवाई केली जाणार आहे.

३. गुप्त माहिती काढण्यासाठी विशेष पथके:सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १५ अंमलदारांच्या ३० संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पोलीस स्टेशन आणि जिल्हा विशेष शाखांच्या समन्वयाने कार्यरत राहणार आहे.

४. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त:वारीच्या मुक्कामस्थळी चोरी, गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिपत्याखाली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

वरील सर्व उपाययोजना संतांची परंपरा, वारीचा भक्तिभाव व यात्रेची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी करण्यात आले असून, प्रशासन नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड