शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

Ashadhi Wari 2024: पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी

By विश्वास मोरे | Updated: June 20, 2024 20:08 IST

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टालची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. कारवाई केली जाणार आहे.....

पिंपरी : आषाढी वारी सोहळा तोंडावर आला आहे. जिल्हा प्रशासन, अन्न- औषध प्रशासन, देहू देवस्थान, आळंदी देवस्थानाची तयारी पूर्ण झालेली आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टालची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. कारवाई केली जाणार आहे.

देहूगाव येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोहळ्याचे दिनांक २८ जूनला, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून २९ जूनला प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केलेल्या आहेत.  त्यानुसार अन्न -औषध प्रशासन पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने यासंदर्भातील नियोजन केलेले आहे.

तीन जिल्ह्यात ३२ अधिकारी -

संत तुकाराम महाराज पालख्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. या तीनही जिल्ह्याचे नियोजन केले आहे. पालखी मार्गावर १६ विसाव्याची ठिकाणे आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १६ मुक्काम आहेत तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १५ मुक्काम आहेत. प्रशासनाची तयारी सुरू झालेली आहे.

अशी केली जाणार तपासणी-

१) पालखी मार्गावरील हॉटेल, हातगाड्या,  रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल येथील अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यासाठी ३३ अधिकारी नियुक्त केलेले आहे.३) पालखी काळामध्ये विसावे, मुक्कामांच्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी करणार आहे. तसेच अन्न परवाना आहे की नाही. नियमावलीनुसार अन्नपदार्थ शिजवले जातात की नाही, याविषयी तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांचे नमुने घेतले जाणार आहेत.  त्या दोषी आढळल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

वारीच्या अनुषंगाने पालखी मार्गावरील विसाव्यांची ठिकाणे, तसेच हॉटेल, मिठाई दुकाने यामध्ये तयार केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.  तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होते की नाही याची तपासणी केली जाणार आहेत. नोटीस देण्याबरोबरच यामध्ये दोन दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालखी सोहळा काळात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे. 

- सुरेश अन्नापुरे, अतिरिक्त आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022