शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शालेय जीवनापासूनच कलेची मूल्ये रुजवावी : अलारमेल वल्ली; पुण्यात ‘नूपुरनाद महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:53 IST

नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे.

ठळक मुद्दे 'कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात''तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज'

पुणे : नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. कलात्मक माध्यमं कुठलेही असो, कलेतून रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी संवाद घडत असतो. मात्र आज नृत्यातील ‘रसिकत्व’ भाव काहीसा हरवला आहे. युवा पिढीला नृत्याचे कार्यक्रम बोअरिंग वाटतात ही वस्तुस्थिती आहे. नृत्यविषयक जनजागृतीचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे. कलेतील गुंतवणूक वाढवायची असेल तर शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये कलेची मूल्य रुजविली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नृत्यांगना अलारमेल वल्ली यांनी व्यक्त केली. नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. त्यानिमित्त महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रसिद्ध नृत्यांगना स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर उपस्थित होते. चेन्नईप्रमाणे पुणे हेदेखील सांस्कृतिक हब बनले आहे. कलेची जाण असणारे आणि संगीताशी नाळ जुळलेले दर्दी रसिक पुण्यातच पाहायला मिळतात, अशा शब्दांत वल्ली यांनी पुण्याविषयी गौरवोद्गार काढले. नृत्य आणि संगीत हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. संगीतामध्ये  रसिक आणि कलाकारांचा एकमेकांशी आंतरिक संवाद घडतो. नृत्यामध्ये साहित्य, निसर्गसौंदर्य, संस्कृती अशा सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येतो. वेशभूषा, नृत्यशैली, भाव याच्या सादरीकरणातून एका अद्वितीय कलाविष्काराची अनुभूती मिळते. परंतु नृत्यविषयक ज्ञानाच्या अभावामुळे नृत्यकलेमध्ये युवा पिढी फारसा रस घेताना दिसत नाही, तरुणांमध्ये नृत्यकलेबद्दलचे प्रबोधन करण्यासाठी शासन, कलाकार, कॉर्पोरेट आणि पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

कलेची कम्युनिटी एकच सध्या देशात अशांतता, असहिष्णुता या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मात्र कला तू भारतीय, तू पाकिस्तानी अशा स्वरूपाचा धर्म किंवा जातिभेद मानत नाही. कला दोन भाषा आणि प्रांतांत सेतू बांधण्याचे काम करते. कलेची कम्युनिटी एकच आहे, अशा शब्दांत त्यांनी कलेचे महत्त्व विशद केले.

तमिळनाडूमध्येही हा प्रयोग व्हावामहाराष्ट्र शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांना कलेसाठी अतिरिक्त गुण देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे वल्ली यांनी स्वागत केले. महाराष्ट्राप्रमाणे तमिळनाडू राज्यानेदेखील हा प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कलेमध्ये इन्स्टंट फॉर्म्युला नाहीसध्या पैसा आणि झटपट प्रसिद्धीमुळे रिअँलिटी शोकडे पालकांचा कल वाढत आहे. मात्र कलेमध्ये असा इन्स्टंट फॉर्म्युला नसतो. कलेबद्दल श्रद्धा, साधना आणि भक्ती असणे महत्त्वाचे आहे. कला मन:शांती देते, याकडे वल्ली यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे