शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत अभियंत्यांच्या नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: November 18, 2014 03:24 IST

राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत

पुणे : राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका व नगर परिषदालगतच्या ५००० हून अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या भागात अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. मात्र, अभियंत्यांच्या नियुक्तीविषयी जिल्हा परिषद प्रशासनाची उदासिनता आहे. अन्यथा नऱ्हेसारखी घटना घडली नसती. राजीव गांधी सशक्तीकरण अभियानअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना आपले कार्य व जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. साधारणत ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला एक पंचायत अभियंता नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने १ आॅगस्टला दिले होते. त्यानुसार राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ७५ अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे आदेशात म्हटले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १८० ग्रामपंचायतींमध्ये पंचायत अभियंत्यांची नेमणूक करणे अपेक्षित होते. त्यानुसार वृत्तपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण निवड प्रक्रिया आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ९ आॅक्टोबरपूर्वी करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या धिम्या गतीच्या प्रशासनामुळे केवळ ८० अभियंत्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. नऱ्हे येथील घटना साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली. तोपर्यंत सुध्दा पंचायत अभियंत्यांची नेमणूक झालेली नव्हती. शासनाच्या आदेशानुसार पंचायत अभियंता यांच्या तापसणी व परवानगीनंतरच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधकामे करता येणार आहेत. तसेच, ग्रामपंचायतीला पंचायत अभियंत्याच्या परवानगीशिवाय परस्पर बांधकामाला मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येणार आहे. त्यानंतरही अनधिकृत बांधकाम झाल्यास संबंधित पंचायत अभियंत्यांवर जबाबदारी टाकण्यात येते. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेचा आणि अनधिकृत बांधकामांचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नऱ्हेची दुर्घटना घडल्यानंतर तरी प्रशासन पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्त करील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विनायक फडके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)