शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

पंचायत अभियंत्यांच्या नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: November 18, 2014 03:24 IST

राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत

पुणे : राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका व नगर परिषदालगतच्या ५००० हून अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या भागात अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. मात्र, अभियंत्यांच्या नियुक्तीविषयी जिल्हा परिषद प्रशासनाची उदासिनता आहे. अन्यथा नऱ्हेसारखी घटना घडली नसती. राजीव गांधी सशक्तीकरण अभियानअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना आपले कार्य व जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. साधारणत ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला एक पंचायत अभियंता नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने १ आॅगस्टला दिले होते. त्यानुसार राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ७५ अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे आदेशात म्हटले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १८० ग्रामपंचायतींमध्ये पंचायत अभियंत्यांची नेमणूक करणे अपेक्षित होते. त्यानुसार वृत्तपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण निवड प्रक्रिया आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ९ आॅक्टोबरपूर्वी करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या धिम्या गतीच्या प्रशासनामुळे केवळ ८० अभियंत्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. नऱ्हे येथील घटना साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली. तोपर्यंत सुध्दा पंचायत अभियंत्यांची नेमणूक झालेली नव्हती. शासनाच्या आदेशानुसार पंचायत अभियंता यांच्या तापसणी व परवानगीनंतरच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधकामे करता येणार आहेत. तसेच, ग्रामपंचायतीला पंचायत अभियंत्याच्या परवानगीशिवाय परस्पर बांधकामाला मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येणार आहे. त्यानंतरही अनधिकृत बांधकाम झाल्यास संबंधित पंचायत अभियंत्यांवर जबाबदारी टाकण्यात येते. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेचा आणि अनधिकृत बांधकामांचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नऱ्हेची दुर्घटना घडल्यानंतर तरी प्रशासन पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्त करील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विनायक फडके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)