शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:01 AM

भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.

लोणी काळभोर - भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.पं. हदयनाथ मंगेशकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी ध्रुपद गायक पं. उदय भवळकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री. आदिनाथ मंगेशकर व श्री. सुरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केली. डॉ. सुनील राय यांनी आभार मानले. एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधूर शहनाई वादनाने झाली.थोर गायकांचा सत्कार करून मी स्वत:चा सत्कार केला आहे असे मानतो. दहा वषार्पूर्वी संगीत कला अकादमी कशी असवी सात सुरांचे सात बंगले असावे. गार्डन असावे असे मी स्वप्न पाहिले होते. त्या संबंधी मी श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्याकडे बोललो होतो. त्याप्रमाणे ते जगातील एकमेव असे संगीत क्षेत्रातील अद्धितीय अकादमी डॉ. कराड यांनी प्रत्यक्षात साकार केले.- पं.हदयानाथ मंगेशकरसंगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे. भारतरत्न लतादीदींच्या आशीवार्दाने आज येथे संगीत कला अकादमी उभी राहिली आहे. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडणार आहे. संगीताच्या माध्यमातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल.- प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

टॅग्स :musicसंगीत