शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १६ अभियांत्रिकी महाविद्यालये!

By admin | Updated: May 24, 2015 00:25 IST

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून १६ नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना खासगी विना अनुदानित तत्त्वावर प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असताना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून १६ नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना खासगी विना अनुदानित तत्त्वावर प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पीक वाढत चालल्यामुळेच सध्या अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. गेल्या वर्षी सुमारे ६० हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा हा आकडा ६५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे, असे असूनही राज्यात नवीन १६ अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५ फार्मसी, ५ आर्किटेक्चर, ३ व्यवस्थापन आणि एका एमसीए कॉलेजला मान्यता व काहींना तुकडीवाढ देण्याचा अध्यादेश राज्य शासनातर्फे काढण्यात आला आहे. त्यात पुण्यात लोकनेते दादापाटील फराटे महाविद्यालयास फार्मसी अभ्यासक्रमास १२० जागांवर आणि इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट संस्थेस व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सध्या २४० प्रवेश क्षमता असूनही आणखी ६० जागांवर प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे.राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांना मान्यता देऊ नये किंवा मान्यता देण्यापूर्वी शासनाचे मत विचारात घ्यावे, असा पत्रव्यवहार आघाडी सरकारने एआयसीटीकडे केला होता. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. सध्याच्या युती सरकारनेही चालू शैक्षणिक वर्षात एकाही नवीन महाविद्यालयास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे म्हणाले, केंद्र शासन, राज्य शासन आणि एआयसीटीई यांच्यातील समन्वयाच्या आभावामुळेच राज्यात महाविद्यालयांची संख्या वाढत चालेली आहे. त्यामुळे एआयसीटीईने नवीन संस्थांना परवानगी देण्यापूर्वी शासनाने केलेला प्रारूप आराखडा विचारात घेवूनच परवानगी द्यायला हवी.बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. परंतु, दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयातून अकरावी- बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली, तर आपोआपच अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.’’- डॉ. गजानन खराटे अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता केवळ कायद्याच्या चौकटीत राहून नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता देणे उचित होणार नाही. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमास किती विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यातील किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि त्यांना रोजगार प्राप्त होतो. ही आकडेवारी विचारात घ्यावी लागणार आहे. हजारो विद्यार्थी पदव्या घेवून बाहेर पडले. परंतु, त्यांना रोजगार मिळाला नाही; तर त्यांना वैफल्य येते. त्यामुळे नवीन संस्थांना परवानगी देताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच युवाशक्ती व राष्ट्रहित या दृष्टीने विचार करावा लागणार आहे.- डॉ. अरुण अडसूळ, शिक्षणतज्ज्ञ