शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अनिता विपत यांचे निलंबन, चुकीचे आदेश, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा; अनियमिततेमुळे अडचणीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:22 IST

बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते.

पुणे : बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते. शासनस्तरावर याची दखल घेण्यात आली असून, समितीच्या विद्यमान अध्यक्षा अनिता सदानंद विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.बालसुधारगृहे ज्यांच्या अखत्यारीत येतात त्या बालकल्याण समितीमध्ये नेमके काय सुरू आहे याचा शोध घेऊन समितीच्या सदस्यांसह अनेक संस्था चालकांनी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे ‘लोकमत’ने मिळवली होती. विपत यांनी पदावर नसतानाही ४ जानेवारी २०१४ ते १७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीमध्ये बालकल्याण समितीच्या बेंचवर बसून अनेक चुकीचे आदेश स्वत:च्या स्वाक्षरीने काढल्याचे समोर आले होते. याबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार होऊनही कोणतीच कारवाई झालेली नव्हती. यासोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांमध्ये ‘शीतयुद्ध’ रंगल्याने त्याचा फटका मुलांना बसत आहे. मुलांचे आरोग्य, त्यांचे वेगवेगळ्या संस्थांमध्ये होणारे स्थलांतर याबाबत कमालीची अपारदर्शकता याचे गूढ वाढत चालले होते.बालकल्याण समितीच्या अंतर्गत काम करणाºया अनेक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे सुरू आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संस्थांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, पावडर, खोबरेल तेलासाठी मिळणारा निधी संस्थाचालक स्वत:च्याच खिशामध्ये घालत आहेत.बालसुधागृहातील मुलांवर झालेल्या लैंगिक शोषणाकडे तसेच त्यांच्या पिळवणुकीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या प्रकरणांची वाच्यता कोठे होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात आलेली होती. असे प्रकार दडपण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले. अशा अनेक कारणांमुळे शासनाने विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, या वृत्ताला महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपमहिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्येही समितीच्या सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते. संस्थांच्या हिताचा विचार करून संस्थांना सांभाळण्यासाठी मुले देताना आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोपही समितीच्या कार्यपद्धतीवर झाले होते. मुलांच्या हस्तांतरणाबाबत तसेच त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही बाल कल्याण समितीकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत समोर आली आहेत.या अनागोंदी कारभारामुळे अनेक मुलांंचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक जणांना वेळेत शाळा सोडल्याचे दाखले न मिळाल्याने पुन्हा त्याच इयत्तेमध्ये बसण्याची वेळ आली. यासोबतच काही ठराविक संस्थांना मुले दिली जात असून, अनेक मुलांचे धर्मांतरण करून घेण्यात आल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.

टॅग्स :Puneपुणे