शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनिता विपत यांचे निलंबन, चुकीचे आदेश, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा; अनियमिततेमुळे अडचणीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:22 IST

बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते.

पुणे : बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते. शासनस्तरावर याची दखल घेण्यात आली असून, समितीच्या विद्यमान अध्यक्षा अनिता सदानंद विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.बालसुधारगृहे ज्यांच्या अखत्यारीत येतात त्या बालकल्याण समितीमध्ये नेमके काय सुरू आहे याचा शोध घेऊन समितीच्या सदस्यांसह अनेक संस्था चालकांनी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे ‘लोकमत’ने मिळवली होती. विपत यांनी पदावर नसतानाही ४ जानेवारी २०१४ ते १७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीमध्ये बालकल्याण समितीच्या बेंचवर बसून अनेक चुकीचे आदेश स्वत:च्या स्वाक्षरीने काढल्याचे समोर आले होते. याबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार होऊनही कोणतीच कारवाई झालेली नव्हती. यासोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांमध्ये ‘शीतयुद्ध’ रंगल्याने त्याचा फटका मुलांना बसत आहे. मुलांचे आरोग्य, त्यांचे वेगवेगळ्या संस्थांमध्ये होणारे स्थलांतर याबाबत कमालीची अपारदर्शकता याचे गूढ वाढत चालले होते.बालकल्याण समितीच्या अंतर्गत काम करणाºया अनेक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे सुरू आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संस्थांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, पावडर, खोबरेल तेलासाठी मिळणारा निधी संस्थाचालक स्वत:च्याच खिशामध्ये घालत आहेत.बालसुधागृहातील मुलांवर झालेल्या लैंगिक शोषणाकडे तसेच त्यांच्या पिळवणुकीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या प्रकरणांची वाच्यता कोठे होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात आलेली होती. असे प्रकार दडपण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले. अशा अनेक कारणांमुळे शासनाने विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, या वृत्ताला महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपमहिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्येही समितीच्या सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते. संस्थांच्या हिताचा विचार करून संस्थांना सांभाळण्यासाठी मुले देताना आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोपही समितीच्या कार्यपद्धतीवर झाले होते. मुलांच्या हस्तांतरणाबाबत तसेच त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही बाल कल्याण समितीकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत समोर आली आहेत.या अनागोंदी कारभारामुळे अनेक मुलांंचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक जणांना वेळेत शाळा सोडल्याचे दाखले न मिळाल्याने पुन्हा त्याच इयत्तेमध्ये बसण्याची वेळ आली. यासोबतच काही ठराविक संस्थांना मुले दिली जात असून, अनेक मुलांचे धर्मांतरण करून घेण्यात आल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.

टॅग्स :Puneपुणे