शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

अंगणवाड्यांचा बंद मागे, आत्मसन्मानाची लढाई मात्र सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 17:53 IST

शासनाने अंगणवाडीतार्इंची केलेली मानधनवाढ पुरेशी नसली, तरी व्यापक विचार करून राज्य कृती समितीने बंद मागे घेतला आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव पूर्णत: मान्य नसतानाही बंद स्थगित करण्यात आला आहे.अंगणवाड्यांचा कारभार सुधारण्यासाठी व  अंगणवाडीतार्इंना आत्मसन्मानाने काम करता यावे यासाठी सतत संघर्ष चालू राहील.

पुणे : राज्यातील १ लाखावर अंगणवाड्यांचा बंद अखेर २६व्या दिवशी मागे घेण्यात आला. शासनाने अंगणवाडीतार्इंची केलेली मानधनवाढ पुरेशी नसली, तरी व्यापक विचार करून राज्य कृती समितीने बंद मागे घेतला आहे. अंगणवाडीच्या कारभारात सेविका मदतनीसांचे प्रचंड शोषण होत आहे. ते थांबविण्यासाठी बंद मागे घेतला असला तरी न्याय्य मागण्यांविषयी आणि आत्मसन्मानासाठी संघर्ष मात्र सुरूच राहील, असा निर्धार अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी आज येथे व्यक्त केला. बंद मागे घेण्या विषयी काल मुखमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठक व निर्णयाची माहिती देण्यासाठी आज कर्मचारी सभेची सभा झाली त्यात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, राज्यव्यापी बंदला २५ दिवस उलटूनही मुख्यमंत्री चर्चा करायला तयार नव्हते.  २ लाख १० हजार अंगणवाडी ताई संपावर होत्या. उलट संप चिरडण्याचे प्रयत्न सुरु होते. राज्यातील ५० लाख बालके पूरक आहार व ३५ लाख बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित होती. त्यातच बंद काळात बालमृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसूत होत होत्या. अशा वेळी मानव कल्याण क्षेत्रात काम करणार्‍यांनी किती ताणायचे याला काही नैतिक सीमा असते. ती ओलांडू नये म्हणून संपूर्ण राज्यशासनाचा प्रस्ताव पूर्णत: मान्य नसतानाही बंद स्थगित करण्यात आला आहे. बंद थांबला असला तरी अंगणवाड्यांचा कारभार सुधारण्यासाठी व  अंगणवाडीतार्इंना आत्मसन्मानाने काम करता यावे यासाठी सतत संघर्ष चालू राहील. मानधन वेळेवर मिळावे, कामाचे अहवाल देण्याचे साहित्य प्रशासनाने वेळेवर पुरवावे, अंगणवाडीचे भाडे वेळेवर मिळावे, मुख्यसेविका बालविकास अधिकार्‍यांनी सेविका मदतनिसांना सन्मानाची वागणूक द्यावी, यावर या पुढच्या काळात भर राहील.अण्णा भाऊ साठे संस्था, नेहरू स्टेडियम येथे झालेल्या या सभेस शेकडो अंगणवाडी ताई उपस्थित होत्या. 

टॅग्स :agitationआंदोलनPuneपुणे