शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

'ती' स्मशानात एकटीच जळत होती; पोटच्या मुलाने सोडलं वाऱ्यावर आणि सख्या भावाने केला तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 18:10 IST

महिलेच्या मुलाला फोन केल्यावर लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका, माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या वयोवृध्द महिलेवर

सोमेश्वरनगर : पोटच्या मुलाने वाऱ्यावर सोडलं आणि सख्या भावाने तिरस्कार केला शेवटी ती दोन दिवस उपाशी तापासी राहिली आणि ज्या मातीत आयुष्य काढलं शेवटी त्याच मातीत येऊन जीव सोडला ... हृदय पिळावून टाकणारी घटना सोमेश्वरनगर परिसरातील एका गावात घडली आहे.         मंगळवारी त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांंनी आणि लांबच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. वयाच्या ७५ तर ८० वर्षात या वयोवृध्द महिलेने दुसऱ्याच्या शेतात काम करून स्वत:चा उदरनिर्वाह केला. शेवटपर्यंत एकटीच राहिली, रक्ताची नाती आयुष्यभर तिच्या कधी जवळपण आली नाहीत, आणि शेवटच्या क्षणाला देखील कोण बरोबर नव्हतं...पोटच्या मुलाने व सख्या भावाने देखील शेवटच्या घटकेला साथ दिली नाही.           सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील एक ८० वर्षांची महिला आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी मुंबई स्थायिक मुलाकडे हवा पालटासाठी गेली होती. आज अचानक तिचा मृतदेहच सापडला... आज सकाळी वाघळवाडी गावातील काही युवक निरा बारामती रोडवरील हॉटेल अक्षय गार्डन या ठिकाणी गेले असता त्यांना एक ही महिला झोपल्याचे दिसले त्यांना काहीच हालचाल दिसली नसल्याने या युवकांनी पोलीस आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुंबई स्थायिक असलेल्या मुलाला फोनवरून कल्पना दिली असता, लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले. ती वयोवृध्द महिला अनेक महिने या गावात नसल्याने पटकन तिला कोणी ओळखलच नाही.दोन दिवसापासून ही महिला   अक्षय गार्डन येथेच झोपत असल्याचे पाहणाऱ्यांना सांगितले, कदाचित अंगात त्राण नसावा अथवा तिला दोन दिवसांपासून अन्न मिळाले नसावे त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. मात्र ही ज्येष्ठ महिला मुंबईवरून आली आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू नक्की कोरोनामुळे झाला की वृद्धापकाळाने हे समजत नव्हतं त्यामुळे तिच्या जवळ कोणी गेलं नाही. वडगाव निंबाळकर पोलीस  तसेच ग्रामपंचायत वाणेवाडी यांच्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या वयोवृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.           लॉकडाउनमध्ये सर्वच वाहतूक यंत्रणा बंद असतानाही ही वयोवृध्द महिला मुंबईवरून मुलाच्या घरून याठिकाणी आलीच कशी, असा प्रश्न सर्वांना पडला असताना काल एक चार चाकी गाडी या म्हतारीला या ठिकाणी सोडून परत गेल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या