शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

आळंदीत एकेरी वाहतुकीचा बोजवारा, नगरपरिषदेने दिले पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:33 IST

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश कार्तिकी यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते.

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश कार्तिकी यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. परंतु शहरातून एकेरी मार्गाने वाहतूक होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी दुहेरी मार्गाने वाहतूक होत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाचे काटेकोर पालन होत नसल्याचे खुद्द आळंदी नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे असून तसे लेखी निवेदनही त्यांनी आळंदी व दिघी पोलिसांना देऊन एकेरी वाहतुकीची मागणी केली आहे.त्यासंदर्भात गुरुवारी (दि.३०) आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयात आळंदी पोलिस, दिघी पोलीस, पीएमपीएल प्रशासन व नगरपरिषदेच्या पदाधिकाºयांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रशांत कुºहाडे, पांडुरंग वहिले, सचिन गिलबिले, तुषार घुंडरे, दिनेश घुले, बालाजी कांबळे आदींसह आळंदी, दिघी पोलीस व पीएमपीएल प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी जारी केलेल्या आदेशामुळे पीएमपीएलच्या बसला स्थानकात येण्यासाठी संपूर्ण शहरातून फेरी मारावी लागत आहे. मात्र एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचा आदेश इतर वाहतूकदार पाळत नसल्याने प्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दिवसेंदिवस शहरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. परिणामी तास - दीडतास पीएमपीएलची बस या कोंडीत अडकत आहेत.बसमध्ये एकही प्रवासी नसतो. यामुळे बसच्या दिवसातील फेºयावर परिणाम होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून आळंदी पालिकेने फक्त पीएमपीएल बस वायजंक्शन मार्गाने स्थानकात आणण्याची मागणी केली. परंतु या मागणीमुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची पायमल्ली होणार असल्याने पीएमपीएलच्या पदाधिकाºयांनी नगरपालिकेच्या या मागणीला नकार दर्शविला. पूर्वीच्या वायजंक्शन मार्गाने स्थानकात बस आणण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी परवानगी द्यावी; त्यानंतर त्यामार्गावरून बस शहरात आणल्या जातील असे पीएमपीएलच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन तसा प्रस्ताव सादर करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.शहरातील जड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सुमारे १० ते १२ कर्मचाºयांची गरज आहे. मात्र आळंदी पोलीस ठाण्याकडे मुबलक मनुष्यबळ उपलब्ध नाही. तरीही दररोज आमचे १० कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी कार्यरत आहेत. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने संबंधित कारखान्यांना पत्रव्यवहार करून वाहने शहरात न आणण्याचे कळविले आहे. वाहतूकदार व स्थानिक नागरिकांनी एकेरी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे. आमचे काटेकोर नियोजन सुरू आहे.- नंदकुमार गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक, आळंदीआळंदी शहरातून होत असलेल्या जड वाहतूकीमुळे गेल्या चार - पाच दिवसात दोन ते तीन अपघात घडून आले आहेत. तर एकेरी वाहतुक होत नसल्याने या वाहनांमुळे तासनतास कोंडीची समस्या निर्माण होत आहे.शहरातून जड वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरून जड वाहतुकीवर निर्बंध घालावा. तसेच ही वाहने शहरात प्रवेश करण्यापूर्वी पयार्यी मार्गाने वळवावी अशा स्पष्ट सूचना नगरपरिषदेने बैठकीत पोलिसांना दिल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे