शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे मराठा आरक्षणासंबंधीचे अध्यादेश फसवे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 21:17 IST

शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे,

पिंपरी : मराठा समाज संघटनांनी आरक्षण मिळावे, या मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मूक मोर्चे काढले. सनदशीर मार्गाने आंदोलने केली. शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे,अशी माहिती संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मधुकर पाटील, पुणे जिल्हाअध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सावंत, मुंबई विभाग अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभागाचे चंद्रकांत भराट, मराठा युवा महाराष्ट्र अध्यक्ष शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, शासनाकडून मराठा समाजाची घोर फसवणूक झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाणार अशी घोषणा शासनाने केली. एवढेच नव्हे तर अध्यादेश काढला. परंतू, त्याचा काही फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना झाला नाही. शासनाकडून शुल्क मंजूर होईल, त्यावेळी सवलत देण्याचा विचार करू असे शैक्षणिक संस्थांकडून सांगितले जाते. वर्षभराचे सर्व शैक्षणिक शुल्क वसूल केले जाते. अन्य आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करून समाजातील तरूणांना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शासनाने आश्वासन दिले, तसेच अध्यादेश काढला, त्यात जाचक अटी, शर्ती लागू केल्या. घर, जमिन तारण ठेऊन विशिष्ट बँकांमधून कर्ज घेता येईल. अशा अध्यादेशांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आतापर्यात संयम बाळगला आहे. यापुढे आंदोलनाची दिशा काय असावी, यासाठी येत्या ७ एप्रिलला कोल्हापुरमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत इतिहास संशोधक तसेच मराठा समाज संघटनाचे काम करणाऱ्या सोळा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांच्या विचार मंथनातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेला कोणाही लोकप्रतिनिधीला निमंत्रित केलेले नाही. समाजाचा लढा, समाजच लढणार अशी भूमिका घेतली आहे.    

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस