शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 23:24 IST

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्देकोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे: वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण सुरू करावे,अशी मागणी राज्याचे कोरोना साठीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी केली आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही असे सांगतानाच लोकांनी निर्बंध ना पाळल्यामुळे कोरोना पसरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरच रात्रीचा लॉकडाऊनचा काहीही फायदा होत नसून निर्बंध हे मास्क घालणे,डिस्टंसिंग पाळणे या स्वरूपाचे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच शाळा आणि कॉलेज मुळे कोरोना वाढू शकत असून शाळा कॉलेज आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता कोरोना सहित जगायची सवय करायला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील कोरोना ची पहिली केस सापडून ९ मार्च ला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे कोरोना विषयक आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्याशी लोकमत ने संवाद साधला. वाढत्या रुग्ण संख्ये विषयीची कारणं स्पष्ट करताना ते म्हणाले " दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसं वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. त्यात मग विदर्भात रुग्ण संख्येतील वाढ दिसायला लागली.आपल्या कडे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या शाळा कॉलेज सुरू झाले.व्हायरस गेलेला नव्हता. 

सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की हे म्युटेशन आहे का. पण तसे काही गंभीर म्युटेशन हे नसल्याचं स्पष्ट झालं. म्युटेशन हे होतंच. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८००० वं म्यूटेशन आहे. पण व्हायरस ची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदलली नाहीये हे लक्षात आलंय. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगिकरण नीट करत नाहीयेत. त्यामुळे अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह होतं आहे." 

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून त्यांचा चाचण्या वाढवणे गरजेचे आहे असंही साळुंके म्हणाले. सध्या राज्यात सुरु असलेल्या लोकडाऊन आणि निर्बंध बाबत विचारल्यावर ते म्हणाले ," पूर्ण लॉकडाउनला कोणाचीच आता सहमती असणार नाही.पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्न पुढे ढकला.बाहेर पडताना मास्क घाला.शाळा कॉलेज काही महिने तरी सुरू करायचा विचार करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्याचा वर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीचे कर्फ्यु लावल्याचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही.तो पॅडमिक न राहता इंडेमिक म्हणून राहील. "

सध्या सुरू झालेलं लसीकरण हे आधार असलं तरी लसीकरण झालं म्हणजे निश्चिंत व्हाल असेही नाही तर त्यानंतर ही नियम पाळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच केंद्र सरकार ला लसीकरण करण्या बाबत आपण मागणी केली असल्याचे ही त्यांनी सांगितले. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरण आणि त्या बरोबरच कोरोना चे नियम पाळणे हे गरजेचं आहे. मी गेले ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालक यांचा समोर आग्रह धरतो आहे की आता लसीकरण करण्यासाठी सगळ्यांनाच परवानगी द्यायला हवी. सगळे लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्या कडे १८ चा खालचा लोकांना लसीकरणाची परवानगी नाही. पण त्या वरचा सगळ्या लोकांचं लसीकरण पुढचा महिनाभरात करणं गरजेचं आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेCorona vaccineकोरोनाची लस