शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दारूच्या नशेत रिक्षाचालकाने राजाराम पुलावरून मारली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:56 IST

दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पुण्यातील सिहंगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला घडली. दरम्यान, या घटनेत त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला.

पुणे: दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पुण्यातील सिहंगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला घडली. दरम्यान, या घटनेत त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला.

रिक्षाचालकाने दारूच्या नशेत राजाराम पुलावरून उडी मारली. यावेळी उपस्थित तरुणांनी धोकादायक परिस्थितीत प्रसंगावधान राखून पुलाखाली जाऊन त्या रिक्षाचालकाला बाहेर काढले. यावेळी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत अग्निशामक दलाची वाट पाहात होते. रिक्षाचालक रवींद्र विनोबा उभे( वय 43 औदुंबर  कॉलनी कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे.

पुलावरून उडी मारल्यानंतर त्याला बघण्यासाठी पुलावर लोकांची गर्दी झाली होती. नशेमध्ये त्याने पुलावरून उडी मारली पण नदीत गाळ होता त्यामुळे त्याला जास्त लागले नाही. कर्वेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पण ते त्याला काढायला खाली उतरले नाहीत. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याला वाचविण्यासाठी शुभम येडे, समाधान वीर, ओमप्रकाश नामदेव आटोळे, सुशांत आंबेकर, अमेय डाळिंबकर या तरुणांनी नदी पात्रात उतरुन सुखरूप बाहेर काढले.

बाहेर काढल्यानंतर रिक्षाचालक हा हसत होता आणि सगळ्यांशी बोलत होता. आज महात्मा गांधी जयंतीदिनी शहीद व्हायचे होते म्हणून उडी मारली असल्याचे तो सांगत होता.

 

टॅग्स :Puneपुणे