शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आळंदीत पाणीपुरवठा विस्कळीत , जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:52 IST

आळंदी आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.आळंदीतील पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सिद्धबेट येथे नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे; मात्र सदोष कार्यपद्धतीमुळे आळंदीला विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आळंदीकर सध्या विकत पाणी घेऊन पीत आहेत. नवीन जलशुद्धीकरण यंत्रणेचे फिल्टर बेड खराब झाले असून वाळू बदलण्याचे काम सुरू आहे. याशिवाय पंपिंगची यंत्रणाही चोकअप केंद्र सध्या पूर्णपणे बंद आहे. यामुळे जुन्या प्रकल्पातूनच शहराला पाणी वितरित केले जात आहे.पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र जलशुद्धीकरण केंद्रात वाळू बदलण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती दिली आहे; मात्र प्रत्यक्षात हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. वर्षभरात नव्या जलशुद्धीकरण केंद्राची वाळू खराब कशी झाली? दोन ट्रक वाळू काढली. पंपिंग यंत्रणा चोक अप झाली. यामुळे पालिकेचे नाव खराब होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराने नीट काम करावे; अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.कोट्यवधी निधी वापरूनही नागरिकांना फायदा होणार नसेल, तर सरकारी यंत्रणांचा उपयोग काय? कंत्राटदाराने आळंदीसारख्या ठिकाणी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कंत्राटदार बदलण्याची शिफारस शासनाला करू.- वैजयंता उमरगेकर,नगराध्यक्षा, आळंदी नगर परिषदनवा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडल्याने जुन्या प्रकल्पावरून पाणी शुद्ध केले जात आहे. त्याची क्षमता कमी असल्याने आळंदीकरांना येत्या अकरा तारखेपर्यंत कमीदाबाने पाणीपुरवठा होईल; मात्र त्यानंतर सुरळीतपाणीपुरवठा होईल.- दत्तात्रय सोनटक्के,पाणीपुरवठा विभागप्रमुख

टॅग्स :Waterपाणी