शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:02 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. देवस्थानाकडून मंदिर परिसरातही भाविकांना स्वच्छ पाणी पुरविण्यात येईल.अलंकापुरीत कार्तिकी सोहळ्याला लाखो भाविक येतात. शहरातील सर्वच उपलब्ध पाणीस्रोतांच्या ठिकाणी भाविकभक्तांची मोठी गर्दी होते. अशा वेळी जास्त पाण्याची आवशकता भासत असल्याने उपलब्ध पाणी अशुद्ध होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. परिणामी, वारकºयांना मिळेल त्या पाण्याचा आसरा घेऊन वेळ काढावी लागते. परंतु, कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून २४ तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने दर २ तासांनी शहरात पुरेशा प्रमाणात पाणी वितरित केले जाणार आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नवीन पाणीपुरवठा केंद्राचे काम करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा केंद्राकडील यंत्रसामग्रीची अपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू असून, नगरपालिका हद्दीतील पाण्याची गळती थांबविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी १० टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील प्रमुख ठिकाणी हे शुद्ध पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागात विश्रांतीसाठी असलेल्या वारकºयांना या पाण्याचा उपयोग करता येईल. दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना स्वयंपाक करताना नेहमीच स्वच्छ पाण्याची अडचण निर्माण होत असते.अलंकापुरीत शनिवार (दि. ११) पासून ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा केंद्रातील सर्व पंप २४ तास चालू ठेवून ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा शहराला करावा लागतो. त्यामुळे नादुरुस्तहोण्याची शक्यता असल्याने दक्षता घेण्यात येईल. 

टॅग्स :Waterपाणी