शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:02 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. देवस्थानाकडून मंदिर परिसरातही भाविकांना स्वच्छ पाणी पुरविण्यात येईल.अलंकापुरीत कार्तिकी सोहळ्याला लाखो भाविक येतात. शहरातील सर्वच उपलब्ध पाणीस्रोतांच्या ठिकाणी भाविकभक्तांची मोठी गर्दी होते. अशा वेळी जास्त पाण्याची आवशकता भासत असल्याने उपलब्ध पाणी अशुद्ध होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. परिणामी, वारकºयांना मिळेल त्या पाण्याचा आसरा घेऊन वेळ काढावी लागते. परंतु, कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून २४ तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने दर २ तासांनी शहरात पुरेशा प्रमाणात पाणी वितरित केले जाणार आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नवीन पाणीपुरवठा केंद्राचे काम करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा केंद्राकडील यंत्रसामग्रीची अपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू असून, नगरपालिका हद्दीतील पाण्याची गळती थांबविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी १० टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील प्रमुख ठिकाणी हे शुद्ध पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागात विश्रांतीसाठी असलेल्या वारकºयांना या पाण्याचा उपयोग करता येईल. दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना स्वयंपाक करताना नेहमीच स्वच्छ पाण्याची अडचण निर्माण होत असते.अलंकापुरीत शनिवार (दि. ११) पासून ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा केंद्रातील सर्व पंप २४ तास चालू ठेवून ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा शहराला करावा लागतो. त्यामुळे नादुरुस्तहोण्याची शक्यता असल्याने दक्षता घेण्यात येईल. 

टॅग्स :Waterपाणी