शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:02 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. देवस्थानाकडून मंदिर परिसरातही भाविकांना स्वच्छ पाणी पुरविण्यात येईल.अलंकापुरीत कार्तिकी सोहळ्याला लाखो भाविक येतात. शहरातील सर्वच उपलब्ध पाणीस्रोतांच्या ठिकाणी भाविकभक्तांची मोठी गर्दी होते. अशा वेळी जास्त पाण्याची आवशकता भासत असल्याने उपलब्ध पाणी अशुद्ध होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. परिणामी, वारकºयांना मिळेल त्या पाण्याचा आसरा घेऊन वेळ काढावी लागते. परंतु, कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून २४ तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने दर २ तासांनी शहरात पुरेशा प्रमाणात पाणी वितरित केले जाणार आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नवीन पाणीपुरवठा केंद्राचे काम करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा केंद्राकडील यंत्रसामग्रीची अपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू असून, नगरपालिका हद्दीतील पाण्याची गळती थांबविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी १० टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील प्रमुख ठिकाणी हे शुद्ध पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागात विश्रांतीसाठी असलेल्या वारकºयांना या पाण्याचा उपयोग करता येईल. दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना स्वयंपाक करताना नेहमीच स्वच्छ पाण्याची अडचण निर्माण होत असते.अलंकापुरीत शनिवार (दि. ११) पासून ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा केंद्रातील सर्व पंप २४ तास चालू ठेवून ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा शहराला करावा लागतो. त्यामुळे नादुरुस्तहोण्याची शक्यता असल्याने दक्षता घेण्यात येईल. 

टॅग्स :Waterपाणी