शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:35 IST

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत.

- निनाद देशमुखपुणे : देशभरातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांचे कामगार महिनाभराच्या संपावर गेले आहेत. यामुळे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात घट होणार असून या काळात जवळपास १ हजार कोटींचे नुकसान होणार आहे. या सोबतच लष्कर, नौदल, हवाईदल आणि निमलष्करी दलाच्या शस्त्रपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.लष्कर, नौदल हवाई दलाबरोबरच निमलष्करी दल आणि पोलीस दलांना लागणाऱ्या शस्त्रांस्त्रांची निर्मिती आॅर्डनन्स फॅक्ट्रीद्वारे करण्यात येते. यात देशी बनावटीचे इन्सास रायफल, एके -४७, मोर्टार, उखळी तोफा, रणगाड्यांना लागणारे तोफगोळे, विविध प्रकारची स्फोटके तसेच शस्त्रात्रे बनवली जातात. लष्कराच्या मागणीतर्फे या कंपन्यांना वर्षभराची आॅर्डर दिली जाते. त्यांच्या मागणीनुसार वर्षभर उत्पादन करून ती पुरविण्यात येते. मात्र, संपामुळे महिनाभर कारखाने बंद राहणार असल्याने संरक्षण सामग्रीवर मोठा परिणाम होणार आहे.दरवर्षी जवळपास ५२ हजार कोटींच्या शस्त्रांस्त्रांची मागणी संरक्षण दलातर्फे आॅर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे केली जाते. त्यानुसार देशभरात असणाºया विविध कारखान्यांतून त्याचे उत्पादन करून पुरवठा केला जातो. पुण्यात खडकी येथे अतिविस्फोटके आणि देहू येथे दारुगोळा तयार होतो. प्रामुख्याने देशी बनावटीची इन्सास रायफल, एके-४७, तसेच उखळी तोफांना लागणारा दारूगोळा, छोटी शस्त्रास्त्रे आणि बंदुकांना लागणारे अ‍ॅम्यूनेशन प्रामुख्याने बनविले जाते. मात्र, तिन्ही कंपन्यातील कामगार संपावर गेल्यामुळे हे सर्व उत्पादन ठप्प झाले आहे.खासगी कंपन्यांचा आधार आवश्यक;आयुध निर्माणीचे स्पष्टीकरणबदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खासगी कंपन्यांचा आधार घेणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण आयुध निर्माणीच्या केंद्रीय मंडळाकडून देण्यात आले आहे. कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या पाशर््वभूमीवर मंडळाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, काही वर्षांमध्ये विविध समित्यांनी आयुध निर्माणी कारखान्यांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कामात गती आणि पद्धतशीरपणा यावा, यासाठी आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण करणे, खासगी कंपन्यांच्या सहकार्याने उत्पादनक्षमता वाढविणे आदी उपाययोजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही समित्यांनी सांगितले आहे. त्या नुसार निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.आॅर्डनन्स फॅक्ट्रीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा उत्पादनावर परिणाम होणार असला तरी देशाच्या शस्त्रसज्जतेवर परिणाम होणार नाही. कारण तशी तजवीज आधीच केलेली असते. सरकारने घेतलेला निर्णय हा चांगला आहे. यामुळे शस्त्रास्त्र बनविण्याचा वेग वाढेल. यामुळे कामगारांनी देशहिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्यावा.- दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल.

टॅग्स :Puneपुणे