शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:35 IST

पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले...

पिंपरी : मी अनेक वर्ष पत्रकारितेत काम केले आहे. महाराष्ट्रात अजून पत्रकारिता जिवंत आहे. राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत. पत्रकारांनी ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ट्रोल करण्यासाठी अनेक पक्षांनी लोकं पाळली आहेत. सध्या राज्याच्या हिताचं बोलणे, वाचणे आवश्यक आहे, असं पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरेपुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारताना काळजी घेतले पाहिजी. कोणते प्रश्न विचारले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे राज्यातील राजकारणाची भाषा सध्या बदलत आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. आलेली सत्ता जाते हे राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.

भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार सत्तेत

यावेळी ठाकरे म्हणाले, जर एखादा हल्ला आमच्यावर झाला तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटं बोलतो, त्याला जर लोक हसत असतील त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल. असंही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड दौरा-

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिकांनी एकत्र येत मनसेची शाखा शहरात सुरू केली. आता दीड दशकानंतर या पक्षाला संघटनात्मक बांधणीबरोबर पक्ष नेतृत्वाच्या पाठबळाची असलेली गरज आजही आहे. शनिवारी (दि. १८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिवतीर्थमधून हे बळ मिळणार काय? याची प्रतीक्षा मनसैनिकाला आहे.

पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष-

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणीच ताकद वाढविण्यासाठी भर दिला. त्या तुलनेत त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. तरीही त्यांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा मनसैनिक आजही लढताना दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना (ठाकरे, शिंदे) यांच्या स्पर्धेत आणि तुलनेत शहरात मनसेची ताकद फारशी नाही. मात्र, मनसैनिकांनी जपलेला कट्टरपणा, पक्षाच्या अस्तित्वासाठी सुरू ठेवलेली धडपड उल्लेखनीय आहे. त्यातून त्यांचे राज ठाकरेंवरील प्रेमही दिसते. या मनसैनिकाला ठाकरे यांनी राजकीय ताकद दिली असती, विविध प्रश्नांवर मनसेची म्हणून जर भूमिका घेतली असती, तर पक्षवाढीला बळ मिळाले असते; पण त्याकडे ठाकरे यांचे दुर्लक्ष झाल्याने मनसेचा अवकाश मर्यादित राहिला.

कार्यकर्त्यांना हवाय बूस्टर...

गेल्या सोळा वर्षात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्याचा फटका पक्षवाढीवर आणि संघटनात्मक ताकदवाढीवर झाला. निवडणूक कार्यकर्त्यांसाठी बूस्टर असतो; पण ती न लढल्याने मनसेची ताकद मर्यादित राहिली. तरीही जनहिताचे लहान-मोठे प्रश्न घेऊन मनसैनिक व्यवस्थेला जाब विचारत आहेत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय ताकद निर्माण झालेली नाही, हे वास्तव आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरे