शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:35 IST

पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले...

पिंपरी : मी अनेक वर्ष पत्रकारितेत काम केले आहे. महाराष्ट्रात अजून पत्रकारिता जिवंत आहे. राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत. पत्रकारांनी ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ट्रोल करण्यासाठी अनेक पक्षांनी लोकं पाळली आहेत. सध्या राज्याच्या हिताचं बोलणे, वाचणे आवश्यक आहे, असं पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरेपुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारताना काळजी घेतले पाहिजी. कोणते प्रश्न विचारले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे राज्यातील राजकारणाची भाषा सध्या बदलत आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. आलेली सत्ता जाते हे राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.

भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार सत्तेत

यावेळी ठाकरे म्हणाले, जर एखादा हल्ला आमच्यावर झाला तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटं बोलतो, त्याला जर लोक हसत असतील त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल. असंही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड दौरा-

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिकांनी एकत्र येत मनसेची शाखा शहरात सुरू केली. आता दीड दशकानंतर या पक्षाला संघटनात्मक बांधणीबरोबर पक्ष नेतृत्वाच्या पाठबळाची असलेली गरज आजही आहे. शनिवारी (दि. १८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिवतीर्थमधून हे बळ मिळणार काय? याची प्रतीक्षा मनसैनिकाला आहे.

पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष-

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणीच ताकद वाढविण्यासाठी भर दिला. त्या तुलनेत त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. तरीही त्यांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा मनसैनिक आजही लढताना दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना (ठाकरे, शिंदे) यांच्या स्पर्धेत आणि तुलनेत शहरात मनसेची ताकद फारशी नाही. मात्र, मनसैनिकांनी जपलेला कट्टरपणा, पक्षाच्या अस्तित्वासाठी सुरू ठेवलेली धडपड उल्लेखनीय आहे. त्यातून त्यांचे राज ठाकरेंवरील प्रेमही दिसते. या मनसैनिकाला ठाकरे यांनी राजकीय ताकद दिली असती, विविध प्रश्नांवर मनसेची म्हणून जर भूमिका घेतली असती, तर पक्षवाढीला बळ मिळाले असते; पण त्याकडे ठाकरे यांचे दुर्लक्ष झाल्याने मनसेचा अवकाश मर्यादित राहिला.

कार्यकर्त्यांना हवाय बूस्टर...

गेल्या सोळा वर्षात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्याचा फटका पक्षवाढीवर आणि संघटनात्मक ताकदवाढीवर झाला. निवडणूक कार्यकर्त्यांसाठी बूस्टर असतो; पण ती न लढल्याने मनसेची ताकद मर्यादित राहिली. तरीही जनहिताचे लहान-मोठे प्रश्न घेऊन मनसैनिक व्यवस्थेला जाब विचारत आहेत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय ताकद निर्माण झालेली नाही, हे वास्तव आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरे