शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:35 IST

पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले...

पिंपरी : मी अनेक वर्ष पत्रकारितेत काम केले आहे. महाराष्ट्रात अजून पत्रकारिता जिवंत आहे. राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत. पत्रकारांनी ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ट्रोल करण्यासाठी अनेक पक्षांनी लोकं पाळली आहेत. सध्या राज्याच्या हिताचं बोलणे, वाचणे आवश्यक आहे, असं पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरेपुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारताना काळजी घेतले पाहिजी. कोणते प्रश्न विचारले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे राज्यातील राजकारणाची भाषा सध्या बदलत आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. आलेली सत्ता जाते हे राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.

भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार सत्तेत

यावेळी ठाकरे म्हणाले, जर एखादा हल्ला आमच्यावर झाला तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटं बोलतो, त्याला जर लोक हसत असतील त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल. असंही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड दौरा-

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिकांनी एकत्र येत मनसेची शाखा शहरात सुरू केली. आता दीड दशकानंतर या पक्षाला संघटनात्मक बांधणीबरोबर पक्ष नेतृत्वाच्या पाठबळाची असलेली गरज आजही आहे. शनिवारी (दि. १८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिवतीर्थमधून हे बळ मिळणार काय? याची प्रतीक्षा मनसैनिकाला आहे.

पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष-

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणीच ताकद वाढविण्यासाठी भर दिला. त्या तुलनेत त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. तरीही त्यांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा मनसैनिक आजही लढताना दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना (ठाकरे, शिंदे) यांच्या स्पर्धेत आणि तुलनेत शहरात मनसेची ताकद फारशी नाही. मात्र, मनसैनिकांनी जपलेला कट्टरपणा, पक्षाच्या अस्तित्वासाठी सुरू ठेवलेली धडपड उल्लेखनीय आहे. त्यातून त्यांचे राज ठाकरेंवरील प्रेमही दिसते. या मनसैनिकाला ठाकरे यांनी राजकीय ताकद दिली असती, विविध प्रश्नांवर मनसेची म्हणून जर भूमिका घेतली असती, तर पक्षवाढीला बळ मिळाले असते; पण त्याकडे ठाकरे यांचे दुर्लक्ष झाल्याने मनसेचा अवकाश मर्यादित राहिला.

कार्यकर्त्यांना हवाय बूस्टर...

गेल्या सोळा वर्षात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्याचा फटका पक्षवाढीवर आणि संघटनात्मक ताकदवाढीवर झाला. निवडणूक कार्यकर्त्यांसाठी बूस्टर असतो; पण ती न लढल्याने मनसेची ताकद मर्यादित राहिली. तरीही जनहिताचे लहान-मोठे प्रश्न घेऊन मनसैनिक व्यवस्थेला जाब विचारत आहेत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय ताकद निर्माण झालेली नाही, हे वास्तव आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरे